ता.पं.कार्यकारी अधिकारी कलादगी यांचे पीडीओंना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनामुळे बरीच कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे याला गती देण्यासाठी आता आळस झटका आणि कामाला लागा, असे आवाहन करत विकासकामांना गती देण्यासाठी आता जोरदार प्रयत्न होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उद्योग खात्री, शौचालये आणि इतर बऱयाच योजनांतील कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे तातडीने या कामांना चालना देऊन तालुक्मयाचा विकास साधावा, असे आवाहन तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केले.
तालुका पंचायतच्या महात्मा गांधी सभागृहात पीडीओंच्या विकास आढावा बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले आहे. व्यासपीठावर तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद उपस्थित होते. प्रत्येक ग्राम पंचायतीमधील ग्राम विकास अधिकाऱयांनी आता आळस झटकून कामाला लागले पाहिजे. मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाकाळात कामे रेंगाळली आहेत. कोरोनाशी झुंज देत आता कामाला लागणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी काही पीडीओंना तंबीही देण्यात आली.
उद्योग खात्री योजनेतून अनेकांना कामे मिळत नसल्याची ओरड तालुक्मयात सुरू आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम दिले गेले नाहीतर त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? असा सवाल करत त्यांना तातडीने कामे द्या, याचबरोबर तलावांच्या खोदाईसाठी निरंतर प्रयत्न करून वेगवेगळय़ा डोंगराळ भागातून येणारे पाणी अडविण्यासाठी तलावांची निर्मिती करा. वारंवार सांगूनही जे कोणी दुर्लक्ष करत असतील त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सध्या शाळांना सुटी असली तरी तेथील शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक शाळांमध्ये शौचालयांसाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रत्येक सरकारी शाळांमध्ये हायटेक शौचालय निर्मिती करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असून याकडे ग्राम विकास अधिकाऱयांनी खास निधी राखून प्रयत्न करावेत. तालुक्मयातील मराठी, कन्नड किंवा उर्दु शाळा असू द्या, त्या ठिकाणी शौचालये निर्मितीसाठी विशेष निधीची तरतूद करून त्यांची निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सध्या तालुक्मयातील वेगवेगळय़ा कामांना गती मिळेनाशी झाली आहे. अनेक ग्राम विकास अधिकाऱयांना हाताशी धरून चालवण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी अनधिकृत कामे करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे अशा पीडीओंनी सरकारच्या नियमानुसारच कामे करण्यावर भर द्यावा. अन्यथा, त्यांची गय केली जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे विकासासाठी रात्री-अपरात्री आपल्याला हाक मारावी, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, विकासाची बोंब आणि कामाचा बोजवारा उडेल अशी कामे न केलेली बरी. योग्य कामासाठी नियोजन करून ते पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले. यावेळी तालुक्मयातील ग्रामविकास अधिकारी, इंजिनिअर व इतर कर्मचारी उपस्थित होते..