ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखीमपूर खेरी हिंचाचार प्रकरणात 12 तासांच्या सखोल चौकशीनंतर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. मध्यरात्रीनंतर त्याला कोर्टात हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी लखीमपूर जिल्हा कारागृहात करण्यात आली. आशिषचे वकील अवदेश कुमार सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) उपेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय एसआयटीने आशिष मिश्राला अटक केल्यानंतर मध्यरात्री न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. दरम्यान, पोलिसांनी आशिषच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर 11 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.