इएलसीआयएनए यांची माहिती : आयात घटविण्यावर होणार प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक निर्मिती सेवा क्षेत्र 2025 पर्यंत सहा पटीने विकसित होणार असल्याचा अंदाज इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया (इएलसीआयएनए) यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. याच दरम्यान सदरच्या क्षेत्रात जवळपास 11 लाख कोटी रुपयांची उलाढाल राहणार असल्याची माहिती दिली आहे. 2019 मध्ये ग्लोबल पातळीवर इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्राचा ( इएमएस) व्यवहार 832 अब्ज डॉलर्स राहिला आहे. 2025 पर्यंत यामध्ये वाढ होत 1,055 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.
इएलसीआयएनए यांच्या अंदाजाप्रमाणे भारताचा इएमएस उद्योग तेजीसोबत 2019 च्या दरम्यान 23.3 अब्जने वधारुन 2025 पर्यंत 152 अब्जापर्यंत झेपावण्याची शक्यता आहे. जागतिक बाजाराची वाढ ही 3 टक्क्यांच्या तुलनेत आगामी पाच वर्षांत भारताच्या इएमएस वाढीसोबत 14 टक्क्यांवर राहणार असल्याचे संकेत आहेत.
आयात घटल्याने निर्यातीवर भर
देशामध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंबलींगसाठी आणि आयातीवरचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करुन देशातील उत्पादनास चालना देण्यावर विचार करण्यात येत असल्याचे इएमएस टास्क फोर्स अहवालानुसार स्पष्ट होत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड आयटी विभागाचे सचिव अजय प्रकाश साहनी सांगितले आहे. सर्वर्स, लॅपटॉप आणि टॅबलेट्स यासारख्या उत्पादनांची निर्मिती होणार आहे.