पोस्टाला 26 लाखाचे उत्पन्न
प्रवीण जाधव / रत्नागिरी
सध्याचे युग हे ई-बँकिंगचे असतानाही टपाल विभागाच्या मनीऑर्डर सेवेला आजही चांगला प्रतिसाद लाभत आह़े टपाल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिह्यातून 5 कोटी 9 लाख रूपयांची इंस्टंट मनीऑर्डर केल्या गेल्या. 40 हजारांहून अधिकजणांनी पोस्टाच्या या सेवेचा लाभ घेतला असून टपाल विभागाला यातून 26 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आह़े
भारतीय टपाल विभागाकडून बदलत्या काळानुसार मनीऑर्डर सेवाही जलद करण्यात आली आह़े आता तत्काळ पैसे उपलब्ध करून देण्याची सुविधा टपाल विभागाने केली आह़े याचा मोठा फायदा विद्यार्थी, कष्टकरी, नाकरीनिमित्त परजिह्यात अथवा राज्यात राहणाऱया सर्वसामान्य लोकांना झाला आह़े भारतात गावपातळीवर बँकिंग सेवेला मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आह़े हीच बाब टपाल खात्याच्या पथ्यावर पडत आह़े प्रत्येक गावात पोस्टमन व टपाल कार्यालय असल्याने तत्काळ पैसे पोहोचवण्यासाठी मनीऑर्डर सेवाच उपयुक्त ठरत आह़े
भारतीय टपाल खात्याने 1880 पासून मनीऑर्डर सेवा सर्वसामान्य भारतीयांसाठी उपलब्ध करून दिली होत़ी देशातील 1 लाख 55 हजार टपाल कार्यालयातून देशाच्या काना-कोपऱयात पैसे पोहोचण्याची खात्रीशीर सुविधा म्हणून अल्पावधीतच ही सेवा लोकप्रिय झाल़ी काळानुरूप यात बदल होत गेले. आता पारंपरिक मनीऑर्डर सेवेऐवजी पोस्टाने इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर व इंस्टंट मनीऑर्डर सेवा सुरू केल्या आहेत़ यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोस्ट विभागाकडून सांगण्यात आल़े
इंस्टंट मनीऑर्डरद्वारे 1 हजारपासून 50 हजार रूपयांपर्यंत रक्कम स्थलांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आह़े इंटरनेटवर आधारित इंस्टंट सेवेतून आईएमओ सुविधा असलेल्या टपाल कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक फॉर्म भरून या सेवेचा लाभ घेता येत़ो शहरी भागाला ग्रामीण क्षेत्राशी जोडणारे टपाल विभाग एक महत्वाचे साधन आह़े 21 व्या शतकात ई-बँकिंगच्या जमान्यातही मनीऑर्डर करण्यालाच अनेकांची पसंती कायम आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आह़े ग्रामीण भारतात प्रत्येकाजवळ जनधन खाते आह़े मोबाईल व इंटरनेटचा वाढता विस्तार पाहता मनीऑर्डर सेवा बंद पडणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होत़ी मात्र टपाल खात्याने लोकाच्या गरजांचा आणि बँक सेवांच्या मर्यादांचा विचार करून पारंपरिक पद्धतीमध्ये केलेला बदल लोकोपयोगी पडताना दिसून येत आह़े
इंस्टंट मनीऑर्डर म्हणजे काय?
इंस्टंट मनीऑर्डर कोडच्या माध्यमातून चालते. एखादी व्यक्ती पैसे पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला एक कोड नंबर देण्यात येत़ो हा कोड नंबर पैसे ज्याला पाठवायचे आहेत, त्याला मोबाईलद्वारे पाठवला जातो. हा कोड नंबर सांगून तेथील टपाल विभागाच्या कार्यालयात जावून संबंधित व्यक्ती आपले पैसे स्वीकारू शकत़े