उडाण किंवा ‘उडे देश का आम नागरिक’ या धोरणाची सुरुवात नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑक्टोबर 2016 मध्ये केली. धोरण हवे तेवढे यशस्वी झालेले दिसत नाही. महानगरांशी टियर-2 व टियर-3 शहरे व अन्य भारतातील अंतर्गत भाव विमानसेवेन जोडला जावा. सामान्य नागरिकाला कमी खर्चात विमान प्रवास करता यावा, प्रादेशिक विभाग विमानसेवेने जोडले जावेत व प्रादेशिक विमानतळ आधुनिक व्हावेत ही ‘उडाण’ धोरणाची वैशिष्टय़े होती.
उडाण योजनेनुसार जी काही विमाने उडत होती त्यापैकी 45 ते 60 टक्के विमाने कोरोनामुळे सध्या उडत नाहीत. कोरोनाचे परिणाम मार्च 2020 पासून जाणवू लागले पण या योजनेला या अगोदरपासून घरघर लागली होती.
नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑगस्ट 2020 मध्ये नवे 78 उडाण सेवेचे मार्ग जाहीर केले. पण एअरपोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) च्या आकडेवारीनुसार उडाणच्या 766 मार्गांपैकी फक्त एक तृतियांश मार्गावर म्हणजे 285 मार्गांवर ‘उडाण’ योजनेतील विमाने उडत होती.
‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत नियमित विमान कंपन्यांना सध्या प्रवासी मिळत नसून उडाण योजनेत उडणाऱया विमानांचीही तीच अवस्था आहे. उडाणचे काही मार्ग यशस्वी झाले आहेत.
ऑक्टोबर 2016 मध्ये उडाण योजना जाहिर झाल्यानंतर पहिले विमान एप्रिल 2017 मध्ये उडाले होते. केंद्र सरकारने विमान कंपन्यांना त्यांची अर्धी आसने सवलतीच्या दरात विकावित अशा सूचना दिल्या आहेत. व त्याबद्दल या विमान कंपन्यांना ‘सबसिडी’ देण्यात येईल, असे जाहिर करण्यात आले होते.
उडाण योजना सुरू झाल्यापासूनच अडचणीत आहे. आता कोरोनामुळे यात भर पडली. कित्येक विमान कंपन्यांच्या ताफ्यात एअर इंडियाची उपकंपनी असलेली अलायन्स एअर कोरोनापूर्वी त्यांना उडाण योजनेत ठरवून देण्यात आलेल्या 200 मार्गांपैकी फक्त 64 मार्गांवर कार्यरत होती. शासनाची स्वतःची कंपनी पूर्ण क्षमतेने उडाण योजना राबवू शकत नव्हती.
पहिल्या टप्प्यात विमान कंपन्यांना 125 मार्गांवर उड्डाण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तिसऱया टप्प्यात जानेवारी 2019 मध्ये आणखी 235 मार्गांची भर घातली तर चौथ्या टप्प्यात ऑगस्ट 2020 मध्ये आणखीन 78 मार्गांची भर पडली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 29 सप्टेंबर 2020 पर्यंत 45 विमानतळांवर 285 मार्गांवर विमानसेवा कार्यरत आहे.
मोकळे आकाश धोरण प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात खासगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण धोरण अंमलात येईपर्यंत केंद्र सरकारची मक्तेदारी होती. केंद्र सरकारची एअर इंडिया कंपनीची विमाने परदेशात जात तर या एअर इंडियाची उपकंपनी असलेली इंडियन एअरलाइन्स देशात विमानसेवा देत आहे. खासगी कंपन्या अवतरल्या. या सुरुवातीच्या काळात आलेल्या सर्व विमान कंपन्या वेगवेगळय़ा आर्थिक कारणांनी एकेक करून बंद पडल्या. केंद्राची एअर इंडिया प्रचंड तोटय़ात आहे. मोकळे आकाश धोरण सुरू झाल्यानंतर ज्या कंपन्या भारतात अवतरल्या होत्या त्यापैकी एकही कंपनी जरी अस्तित्वात नसली तरी काही खासगी ‘प्लेयर्स’ आजही या क्षेत्रात आहेत.