प्रतिनिधी/ बेळगाव :
तिसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र लॉकलाऊनचा फटका उड्डाणपुलाच्या उभारणीला देखील बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून हे काम बंद ठेवण्यात आले असून पुन्हा काम सुरू करण्यासाठी कामगाराची चणचण भासत आहे. यामुळे कधी पूर्ण होणार आणि रस्ता वाहतूकीसाठी कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिटी योजनेअंतर्गत शहरात विकास कामे राबविण्यात येत आहेत. तसेच तिसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे सर्वच विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे ही कामे अर्धवट अवस्थेत असून शहरवासीयांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ठीकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. परिणामी नागरिकांना याचा फटका बसत आहे. लॉकडॉउन मुळे उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम देखील बंद आहे. तिसरे रेल्वे फाटक परिरसरात एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच तिसऱया रेल्वे फाटकावरून शहरात येण्याचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना दुसऱया रेल्वे फाटकमार्गे यावे लागत आहे. तिसऱया रेल्वे फाटक परिसरात वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अर्धवट असलेली कामे कधी पूर्ण होणार आणि आणि रस्ता वाहतुकीसाठी कधी खुला होणार अशी विचारणा होत आहे. झारखंड आणि बिहार येथील कामगार उड्डाणपुलाचे काम करीत होते. पण लॉकडाऊन मुळे सर्व कामगार घरी परतल्याने काम करण्यासाठी कामगारांची कमतरता भासत आहे. झारखंड आणि बिहार येथील कामगारांना परत येण्यासाठी परिवहन व्यवस्था नसल्याने अडचण झाली आहे. शासनाने परवानगी दिल्यासच हे कामगार बेळगावला येऊ शकतात. पण राज्यातील नागरिकांना काम देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यामुळे झारखंड आणि बिहारचे कामगार येणार की नाही असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदार कामगारांच्या प्रतिक्षेत आहेत. कामगार आल्यानंतरच उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. डिसेंबर पूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होईल अशी अपेक्षा होती. पण कामगारांच्या अडचणी मुळे काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्मयता आहे.