ऑनलाईन टीम / देहरादून :
कोरोना संकटाच्या वेळी घरी परत आलेल्या स्थलांतरितांसाठी निवडणूक विभागाने पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात नोकरी सोडून जे नागरिक घरी परतले अशा नागरिकांना निवडणूक विभागाने उत्तराखंड राज्यात मतदार होण्यासाठी मार्ग खुला केला आहे. यासाठी त्यांना काही आवश्यक औपचारिकता पूर्ण करत अर्ज करावे लागणार आहेत. त्यानंतर निवडणूक विभाग त्यांचे नाव मतदान यादीत जोडून त्यांना ओळखपत्र जारी करणार आहे.
सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी पी. एस. रावत यांनी सांगितले की, जिल्हा निवडणूक विभाग मतदान यादीमध्ये नवीन नाव जोडले आणि अपडेट करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत 12 आणि 13 डिसेंबर रोजी विशेष अभियान होणार आहे. यावेळी सर्व बीएलओ बूथवर उपस्थित राहून नागरिकांना निःशुल्क फॉर्म उपलब्ध करून देणार आहेत.
या अंतर्गत कोरोना संकटात जे लोक दिल्ली, मुंबई, कोलकत्ता सारख्या शहरातून घरी परतले आहेत अशा लोकांना मतदानाचा हक्क देण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. पुढे ते म्हणाले की, ज्या लोकांना नवीन नाव नोंदवायचे आहे त्यांच्यासाठी फॉर्म नंबर 6, नोंदवले नाव काढण्यासाठी फॉर्म 7, नाव दुरुस्तीसाठी आणि हरवलेल्या कार्ड साठी फॉर्म नंबर 8 भरावा लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- ‘एनआरआय’ला देखील मिळणार संधी
मतदानाचा अधिकार मिळवण्याची संधी एनआरआय ला देखील मिळणार आहे. त्यासाठी त्यांना फॉर्म 6 सह पासपोर्टची स्वयं साक्षांकीत केलेली एक प्रत लावावी लागणार आहे. यासोबत संबंधित नागरिक अन्य देशाचे नागरिकत्व नसलेला असणे आवश्यक आहे.