प्रतिनिधी / सातारा :
मानवतेच्या सर्व सीमा ओलांडून अमानुष हा शब्द सुद्धा लाजेल. अमानुष हा शब्द सौम्य वाटेल असे औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करुन मारले. आजही याच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने एक शहर आहे औरंगाबाद. त्या औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे असे कुठल्याही राजकीय नेत्याला वाटत नाही. याच्यासारखे दुर्दैव नाही. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी उरलेल्या अडीच वर्षात औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.
बलिदान मास समाप्तीनिमित्ताने कोडोली येथे शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, सतत नऊ वर्षे औरंगजेबाशी लढणारा महान योद्धा या महाराष्ट्राच्या मातीत होवून गेला. 9 वर्ष सतत घोडय़ावर हातात तलवार घेवून शत्रुशी सामना करत हिंदवी स्वराज्यासाठी लढणारा हा राजा होता. प्रत्येक मोहिमेत सर्वात पुढे असणारे हे राजे होते. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवुन मारणाऱयांपैकी हे नव्हते. हिंदूराष्ट्र, हिंदवी स्वराज्य यासाठी संपुर्ण आयुष्य वेचणारी ही मंडळी होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे राजकारणापुरतेच शिल्लक राहिले आहेत. किती दुदैंवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिव्य पुरष जन्माला आले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याच स्वराज्याच्या सीमा दुप्पटीने वाढवण्याचे काम त्यांच्या सुपूत्राने केले. छत्रपती संभाजी महाराज आणि मानवतेच्या सर्व सीमा क्रॉस करुन अमानुष हा शब्द सुद्धा लाजेल. हा शब्द सौम्य वाटेल असे औरंगजेबांने त्यांचे हाल हाल करुन मारले. आजही याच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने एक शहर आहे औरंगाबाद. त्या औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हाव असे कुठल्याही राजकीय नेत्याला वाटत नाही. याच्यासारख दुर्दैव नाही. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. ज्या शिवसेनेने कायम औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे सामनात लिहिले आहे. माझी खूप अपेक्षा आहे. निदान उरलेल्या अडीच वर्षात एवढे तरी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे.