वाढता उष्मा ठरतोय चिंताजनक, कोरोनाचे रुग्णही वाढतेच
प्रतिनिधी / बेळगाव
दरवर्षी उष्मा वाढला की आरोग्य खाते खडबडून जागे होते आणि नागरिकांना वाढत्या उष्म्यापासून बचाव करून घेण्यासाठी वेगवेगळय़ा टीप्स देते. मात्र यावषी कोरोना महामारीमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच वाढता उष्मा आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आरोग्य खात्याची चिंता वाढविणारी ठरत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याचीही त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.
बेळगावचा पारा सध्या 35 अंशाहून अधिक झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास होऊ लागला असून नागरिक उष्माघाताने आजारी पडू लागले आहेत. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य खाते दरवषी खास सूचना प्रसिद्धीस देते. मात्र मागील वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे आरोग्य खात्याचीही दमछाक झाली आहे. त्यामुळे उष्म्याबाबत देण्यात येणाऱया सूचनांपेक्षा कोरोनावर कसे नियंत्रण मिळविता येईल, याकडेच अधिक लक्ष देण्यात येत आहे.
सध्या उकाडय़ापासून संरक्षण करण्यासाठी सुती कपडय़ांचा वापर करावा. कपडे फिकट रंगाचे आणि ढिले असावेत. प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे, पाण्यामध्ये मीठ आणि साखर घालावी. जमल्यास फळांचे रस प्यावेत, चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी करावे, सोडा व इतर रेडिमेड शीतपेये टाळलेलीच बरी, असे आरोग्य खाते सांगत असते. मात्र यावषी आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे उष्म्यापेक्षाही महाभयानक असणाऱया रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याची धडपड अजूनही संपलेली नाही.
दरम्यान मागील 15 दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसाकाठी बेळगाव जिल्हय़ात 5 ते 10 रुग्ण मिळत होते. त्यांची संख्या आता 35 ते 50 पर्यंत जावून पोहोचली आहे. तर मागील दोन महिन्यात एकही रुग्ण दगावला नव्हता.मात्र दुसऱया लाटेतील कोरोनामुळे जिह्यात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवायचे की उष्म्याबाबत सूचना करायच्या, अशा विवंचनेत आरोग्य खाते आहे.
उष्म्यात ताक आणि नारळपाणी यांचा वापर जास्त करावा. पायात शक्यतो खुले चप्पल वापरावेत, एखाद्या व्यक्तीला उन्हाच्या त्रासाने गोंधळल्यासारखे झाले व तो असंबंद्ध बडबडू लागल्यास त्याला सावलीत न्यावे, यासह अशा अनेक टीप्स आरोग्य खाते दरवषी उष्म्यात वाढ झाल्यानंतर सांगत असते. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे अशा सूचनांपेक्षा त्या विषाणूला आटोक्मयात असे आणता येईल? याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाढली आहे.