कुंडल/ वार्ताहर
साखरेची किमान विक्री किंमत ३३५० रुपये केल्याशिवाय ऊसाची वाढीव एफआरपी आणि वाढीव तोडणी वाहतूक दर देणे साखर उद्योगाला परवडणार नसल्याचे मत अरुण(अण्णा)लाड यांनी केले. तेकुंडल (ता.पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या ऊस गाळप हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी शेतकरी,कामगार,कार्यकर्ते यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकणेत आली.
ते पुढे म्हणाले येणा-या गाळप हंगामावर कोरोनाचे सावट असले तरी काटेकोर नियोजन, शेतक-यांची साथ आणि कामगारांचे बहुमोल सहकार्यामूळे आपण या अडचणीवर नक्की मात करुन हा हंगाम यशस्वी करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावर्षी 14 लाख मे.टन ऊसाची उपलब्धता असून 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगुन गाळप हंगामावर कोरोनाचे सावट असले तरी काटेकोर नियोजन, शेतक-यांची साथ आणि कामगारांचे बहुमोल सहकार्यामूळे आपण या अडचणीवर नक्की मात करुन हा हंगाम यशस्वी करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावर्षी 14 लाख मे.टन ऊसाची उपलब्धता असून 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कोरानामूळे आर्थीक घडी विसकटलेली असतानाच अवकाळी पावसाने पिकांचे खुप नुकसान झाले आहे. कोरोना मुळे येणा-या प्रत्येक ऊस तोडणी कर्मचा-यांची सर्व तपासणी करणेत येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन करणेत आले असून यावर्षीही नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.