ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभेच्या पार्श्वभुमीवर गोवा येथील असोनोरा परिसरात झालेल्या एका सभेत बोलताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणआल्या कि, जर एक गुजराती देशभर फिरू शकतो, तर एक बंगाली का फिरू शकत नाही ? “मला सांगितलं जातं की मी बंगाली आहे. मग ते कोण आहेत ? ते गुजराती आहेत ? आपण असं म्हणतो का की ते गुजराती आहेत म्हणून इथं येऊ शकत नाहीत ? एक बंगाली देशाचं राष्ट्रगीत लिहू शकतो, पण गोव्यात येऊ शकत नाही ? तुम्ही कधी हा प्रश्न उपस्थित केला आहे का की गांधीजी बंगाली आहेत की नाहीत, उत्तरप्रदेशातले आहेत की गोव्यातले ? राष्ट्रीय नेता तोच असतो जो सर्वांना सोबत घेऊन पुढे चालत असतो”.
तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याच्या राजकारणात प्रवेश करण्यामागची नेमकी काय कारणे आहेत. याचबरोबर तृणमूलचे नेमके उद्दीष्ट काय आहे. यावर भाष्य केले. यावेळी ममता यांनी तृणमूल काँग्रेस हा गोव्यातील नेत्यांवर नियंत्रणासाठी नव्हे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गोव्याच्या राजकारणात उतरला आहे. हे लोक राष्ट्रीय नेते कसे बनतील ? ते गोवा गुजरातमधून चालवतात. पण गोवा गुजरात किंवा दिल्लीतून चालणार नाही.
गोव्याचे लोकच गोवा चालवणार आहेत असे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना“आम्ही फक्त मतदानाची वेळ आली की गंगेच्या तीरावर पूजेसाठी जात नाही. मतदानाची वेळ आली तेव्हा मोदीजी गंगेत डुबकी मारतात. तपस्येसाठी उत्तराखंडमधील एका मंदिरात जातात. निवडणुकीची वेळ आली की स्वतः पुजारी बनतात. असे ही त्या यावेळी म्हणाल्या.