नागपंचमी विशेष!
डॉ. अभिराम पद्माकर जोशी / देवगड:
नागाविषयी मनात आदर आहे, म्हणूनच तर आपण त्याचे पूजन करतो. पण, त्याच्या विषारीपणाची आपणाला भीतीही तितकीच वाटते, हेही खरं आहे! पण काळाच्या ओघात या भीतीच्या भावनेने जेव्हा आदरावर मात करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक सापांच्या जीवावर गंडांतर येऊ लागले होते. मग ते अगदी बिनविषारी साप असले तरीही..! शहरीकरणामुळे मुळातच कमी होत चाललेल्या व परिसंस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या सर्पजमातीबाबत वाढलेल्या भीतीच्या भावनेमुळे त्यांच्या डोक्मयावर काठय़ा पडू लागल्या. पण या ढासळणाऱया परिसंस्थेला सांभाळायला शास्त्र लगेच पुढे आले व 1895 साली जगात पहिले सर्पदंशावरचे ‘विषविरोधक’ जन्माला आले. सर्पदंशाने मरणारा मनुष्यप्राणी व भीतीपोटी मारले जाणारे साप या दोघांचेही जीव वाचू लागले.
भारतात मुख्यत्वे आढळणाऱया चार प्रकारच्या विषारी सापांवरची चार वेगवेगळी विषविरोधके मुंबईतील हाफ?कीन इन्स्टिटय़ूटमधेही बनू लागली. नाग, मण्यार, घोणस व फुरसे या चार विषारी सापांवरची विषविरोधके ही डाक्टरांच्या औषध योजनेत रामबाण ठरू लागली. तरीही सापांवरचे गंडांतर काही पूर्णपणे संपले नव्हते. कारण रुग्णाला नेमका कोणत्या प्रकारचा साप चावला? हे डाक्टरांना तंतोतंत समजून चार विषविरोधकांपैकी अचूक ते औषध निवडले जावे, याकरिता चावलेल्या सापाला मारून डॉक्टरांना दाखवायला आणले जात होते. पण, लवकरच या चारही विषविरोधकांना एकाच भात्यात बांधण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाल्यावर सापांनी सुटकेचा फुत्कार टाकला असणार. अशाप्रकारे कोणत्याही विषारी सर्पदंशावर आता हुकमी उतारा मिळू लागला.
आता तुम्ही म्हणाल ‘हे सगळं ठीक आहे. पण, सांगितलेल्या एवढय़ा पुराणात देवगडचा काय संबध?’ पण, हीच तर खरी गंमत आहे. सध्याच्या आमच्या पिढीला माहीत नाही हो! पण, देवगड किंवा कोकणातल्या या कातळी भागात पूर्वी फुरशी मोठय़ा संख्येने असायची. कारण, कोकणातील दमट हवामान व सपाट कातळी पठारे फुरश्यांच्या अधिवासाला पोषक आहेत. खाद्याकरिता येथल्या कातळातील कडेकपारी किंवा लपण्याकरिता पठारांवरील लहान-मोठय़ा दगडांचा मिळणारा आसरा फुरश्याकरिता पूरक ठरतो. कोणत्याही सापाचे विष विरोधक निर्माण करण्याकरिता त्या जातीच्या सापाचे विष हे कच्चा माल म्हणून वापरावे लागते. ते विष मिळविण्याकरिता त्या जातीच्या सापांचा साठा करून ठेवला, तर त्या सापांकडून वेळोवेळी हुकमी विष काढता येऊ शकते. त्या काळात कृत्रिम पैदाशीची व्यवस्था ‘हाफकीन’कडे नसल्याने देशाच्या वेगवेगळय़ा भागात जाऊन विषाकरिता या चार प्रकारच्या सापांना वारंवार पकडून आणावे लागायचे. हाफकीनमध्ये सापांना चांगले पोसून त्यांच्याकडून विष मिळविले जायचे. देवगडच्या कातळी पठारांवर फुरशी विपुल प्रमाणात मिळतात, हे हाफकीनला समजल्याने त्यांनी आपला मोर्चा देवगडकडे वळविला होता.
पन्नास ते साठच्या दशकात देवगडच्या निर्मनुष्य कातळी पठारांवरील कोणताही धोंडा उचलला तरी एखादं फुरसं नक्की मिळायचे, अशी देवगडची ख्याती होती. मग इतक्मया विपुल प्रमाणात मिळणारा कच्चा माल उचलायला हाफकीन सरसावलं नसतं, तरच नवलं! एकंदर वर्षाचा विचार करता मान्सूनच्या सुरुवातीच्या एका महिन्यात फुरशी मुबलक प्रमाणात येथे उपलब्ध असत. मग हाफकीन इन्स्टिटय़ूट त्यांच्या खरेदी अधिकाऱयाला मे महिन्याच्या मध्यावर एक दोन महिन्यांकरिता देवगडला पाठवत असे. असेच एक ‘श्री. नीलकंठ वाड’ नावाचे खरेदी अधिकारी देवगडला येऊ लागले होते. लॉजिंगची व्यवस्था नसलेल्या देवगडमध्ये कोणाच्या तरी घरी दोन महिन्यांकरिता खोली घेऊन त्यांना राहावे लागे. देवगडात घाऊक व्यापारी असलेल्या जोशी यांच्याकडे तुमची एक- दोन महिने राहायची व्यवस्था होईल, असे कोणीतरी सांगितल्याने वाड साहेब जोशी यांच्या एका खोलीत तात्पुरते बिऱहाड थाटत असत.
देवगडच्या किल्ला भागात राहणाऱया काही कसबी लोकांना ही फुरशी पकडण्याची कला परंपरेने अवगत झालेली आहे, हे त्यांना इथे आल्यावर समजले. किल्ल्यातील रहिवाश्यांनी त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून साप पकडण्याकरिता एक चिमटासदृश हत्यार निर्माण केले होते. तो चाप व एका काठीच्या सहाय्याने ते सरपटणाऱया जनावरांना न दुखावता अगदी लिलया पकडू शकतात, हे बघताच वाड साहेबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. जितकी फुरशी आणाल, तेवढी ‘चार आण्याला एक’ याप्रमाणे विकत घेऊ, असा अलिखित करार किल्लेकरांबरोबर लगेच होऊन गेला.
उत्पन्नाचा एक नवीनच मार्ग निर्माण झाल्याने किल्लेकरीही या महिना- दोन महिन्यांच्या कामाकरिता उत्साहाने देवगड तालुकाभर फिरून फुरशी गोळा करत असत. दरवर्षी हजारोंच्या संख्येने जिवंत फुरशी पकडून मुंबईच्या हाफकीन इन्स्टिटय़ूटला पिंजऱयातून रवाना होत होती. काम जरी विधायक असलं, तरी तितकेच जोखमीचे होते. हाफकीन बहुतेकवेळा त्यांची पिंजऱयांची गाडी पाठवत असे. माल वाहतुकीच्या साधन-सुविधांचा अभाव असलेल्या काळात काही कारणांनी इन्स्टिटय़ूटची गाडी जर उपलब्ध झाली नाही, तर पकडलेली फुरशी वेळ पडली तर एसटीच्या टफावरून प्राणी वाहतुकीचा वेगळा परवाना काढून नेली जात होती.
महिना- दोन महिन्यांकरिताचा हा उद्योग जरी द्रविडी प्राणायाम ठरत असला तरी अतिंम विधायक परिणामाकरिता खूप गरजेचा होता. शीत रक्ताचा प्राणी असलेल्या सापांची संथ पचनक्रिया भक्ष्य पचविण्याकरता सात ते आठ दिवस घेत असल्याने साप पंधरा ते वीस दिवसातून फक्त एकदाच खाऊन जिवंत राहू शकतो. किल्लेकरांनी पकडलेली फुरशी ते इन्स्टिटय़ूटची गाडी येईपर्यंत त्यांच्या कडच्या मातीच्या मडक्मयात नारळाच्या करवंटीने मडक्मयाचे तोंड सील करून साठवून ठेवत. मूळत: शास्त्रज्ञाचा पिंड असलेले वाड साहेब हे हाफकीनमध्ये नोकरी करत विषविरोधकांवर मुंबई युनिव्हर्सिटीत पीएचडीही करत होते. ऑफिस व प्रयोगशाळेत काम चालू असताना दोन-दोन महिने फुरशी नेण्याकरिता देवगडला येऊन राहणे हे वाड साहेबांना दिवसेंदिवस कठीण होत होते. पहिली दोन वर्षे देवगडात येऊन या फुरशी खरेदीची घडी त्यांनी उत्तमपणे बसवली होती. आता त्यांना गरज होती ती देवगडमधील एका अशा देखरेख करणाऱया माणसाची की जो या सर्व प्रक्रियेला गेली दोन वर्षे जवळून पाहतो आहे. वाड साहेबांनी त्यांचे तात्पुरते घरमालक असलेल्या जोशी यांच्या मुलासमोर म्हणजे पद्माकर जोशींकडे हा प्रस्ताव ठेवला. मान्सूनच्या सुरुवातीच्या दिवसात पावसामुळे व्यापारात तशीही मंदीच असते. तर मग ही तात्पुरती नवीन वाट चोखंदळून बघायला काय हरकत आहे? असे वाटून पद्माकर जोशींनी ‘हो’ म्हणून टाकले. बरं, या सर्व देखरेखीच्या बदल्यात हाफकीन इन्स्टिटय़ूट जोशी यांना प्रत्येक फुरश्यामागे कमिशन द्यायलाही तयार होती. आतापर्यंत किराणा मालाच्या घाऊक धंद्याची सवय असलेल्या जोशी यांना एकदम जिवंत प्राण्यांचे डिलिंग करणे प्रथम कठीण वाटले. पण त्याचीही लवकरच सवय होऊन गेली.
किल्लेकरांनी मडक्मयातून पकडून आणलेली फुरशी लांबीनुसार वेगवेगळय़ा पिंजऱयात विभागणी करून बंद करणे, त्याचा तपशील तयार करणे व हाफकीनची गाडी आल्यावर त्यात लोड करून देणे, या सर्वांची पद्माकर जोशींना लवकरच सवय होऊन गेली. काही कारणांनी हाफकीनची गाडी येण्यात अडचण आली, तर प्राणी वाहतुकीच्या परवान्याच्या आधारे पिंजरे एसटीच्या टफावर चढवून मुंबईत उतरवून घेऊन नंतर टॅक्सीच्या आत व टफावर चढवलेल्या पिंजऱयांची वरात हाफकिनपर्यंत न्यावी लागत असे. एसटी किंवा टॅक्सीतून जाड कापडाने झाकलेल्या कुलूप बंद पिंजऱयाच्या वाहतुकीवेळी चढउतार करताना हमालांनी किंवा टॅक्सीवाल्यांनी पिंजऱयांना हात लावल्यावर जेव्हा आतून ‘फुस्स’ असा आवाज यायचा, तेव्हा प्रत्येकवेळी पद्माकर जोशी यांच्या किंवा चढउतार करणाऱयांच्या मनात ‘धस्स’ व्हायचे. आवाज ऐकल्यावर हमाल किंवा टॅक्सीवाले काही वेळा पळूनच जायचे. मग परवाना दाखवून पोलिसांच्या मदतीने हमालांना बोलावून त्यात धोकादायक काही नाही, याची खात्री पटवून देऊन काम पूर्ण करून घ्यावे लागायचे. पण क्वचितच कराव्या लागणाऱया एसटीवरच्या प्राणी प्रवासावेळी मात्र क्षणाक्षणाला जोखीम वाटायची व मुंबईपर्यंतचा प्रवास केव्हा एकदा संपतो, असे व्हायचे. तरीही जोशी यांनी हा अशा प्रकारचा जोखमीचा धंदा सुमारे दहा वर्षे चालवला. काही वेळा फुरश्यांबरोबरीने हाफकीनच्या मागणीनुसार इंगळय़ांचा म्हणजे मोठय़ा विंचवांचा पुरवठाही देवगडहून व्हायचा. काही वेळा हाफकीनच्या गरजेनुसार नागांची ऑर्डरही पूर्ण केली जायची. एकावेळी फुरश्यांचे साधारण पाच ते दहा हजार नग देवगडहून मुंबईला पाठविले जायचे.
हे सर्व कठीण होते. तरी विषविरोधकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत फुरशी पकडून देणाऱया देवगडकरांचे व ती फुरशी अडथळय़ाविना मुंबईपर्यंत पोहोचविणाऱया जोशी यांचे योगदान खूप महत्वाचे ठरत होते. हाफकीनच्या या वेळोवेळीच्या फुरशी खरेदी प्रक्रियेवेळी देशी- विदेशी शास्त्रज्ञांची टीमही देवगडला भेट देत असे. असेच एकेवर्षी मूळचे अमेरिकन असलेले पण नंतर भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले सरपटणाऱया प्राण्यांचे तज्ञ रॉम्युलस व्हिटेकर हेही देवगडला आले होते. व्हिटेकरांनी नंतर चेन्नईजवळ ‘मद्रास क्रोकडाईल बँक ट्रस्ट’ नावाचे मोठे क्रोकडाईल पार्क उभे केले. जे आजही दिमाखात उभे आहे. भारतातील सरपटणाऱया प्राण्यांच्या संवर्धन कार्यात किंवा त्यांच्याविषयीच्या समाज जागृतीच्या कार्यात व्हिटेकरांचे योगदान फार मोठे आहे.
फुरश्यांच्या अभ्यासाकरिता येणारे रॉम्युलस व्हिटेकर देवगडच्या सरकारी डाक बंगल्यावर राहत होते व साठ-सत्तरच्या दशकातील देवगडातील खानावळींच्या अभावाकारणे जेवायला जोशी यांच्या घरी येत असत. मुंबईपासून फार लांब असलेल्या देवगडात दहा ते बारा वर्षे असा हा जोखमीचा व्यवहार करत असताना हाफकीनने देवगडच्या फुरश्याच्या जोडीला रायगडमधून ही फुरशी न्यायला सुरुवात केली होती. पण, तिकडे त्यांची घडी फारशी बसली नाही म्हणून तिकडचा बाडबिस्तारा त्यांनी लवकरच आवरला. अशातच हाफकीनने सरपटणाऱया प्राण्याचे ‘कृत्रिम पैदाशीचे’ तंत्रज्ञान त्यांच्या फॅक्टरीच्या आवारात विकसित करायला सुरुवात केली. त्यात ते यशस्वी होऊ लागल्यावर त्यांचे सापांकरिताचे परगावावरचे अवलंबित्व कमी झाले. पण, तरीही फुरश्यांच्या विषविरोधकावरील संशोधनाच्या महत्वाच्या टप्प्यात त्या विधायक कार्याला पूर्णत्वाला नेण्याकरिता देवगडातील फुरश्यांद्वारे देवगडकरांनी लावलेल्या हातभाराचे महत्व फार मोलाचे ठरून गेले.
नागरिकरणाच्या काळात निसर्गातील एक महत्वाचा घटक असणाऱया सरपटणाऱया प्राण्यांची संख्या मूळातच कमी होत असली, तरी समाजात त्या प्राण्यांना वाचविण्याची धारणा मात्र हळूहळू जोर पकडत आहे. गावोगावचे सर्पमित्र या सरपटणाऱया प्राण्यांकरिता खऱयाअर्थाने ‘देवदूत’ बनत आहेत. आजच्या नागपंचमीच्या दिवशी या ऐतिहासिक पानांवरील धूळ मुद्दाम झटकून भूतकाळातील अहिंसक संशोधनाच्या यज्ञात देवगडकरांनी आपली आहुती कशाप्रकारे टाकली होती, याची माहिती देणारी पाने आपणासमोर चाळायला ठेवली आहेत. तोच वसा पुढे बाळगत आपण सर्व सिंधुदुर्गवासीयांनी या अशा अहिंसक नागपंचमीला बारा महिने साजरी करत राहून ‘ही साठा इत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण’ करूया!