वार्ताहर / सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष बीएस्सीचा विद्यार्थी एनसीसी कॅडेट आदित्य राजेंद्र सावंत हा दिल्ली येथे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पॅम्पसाठी गेला होता. तो सध्या मुंबई-बोरिवली येथे अडकून पडला आहे. गावी येण्यासाठी तो धडपडत आहे.
महाराष्ट्रातून दिल्ली येथे एनसीसी पॅम्पसाठी तीन पॅडेटची निवड झाली होती. त्यात सिंधुदुर्गच्या पंचम खेमराज महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा समावेश होता. 22 मार्चपूर्वी दिल्ली येथील पॅम्प संपल्यानंतर गावी येण्यासाठी हे पॅडेट मुंबई मार्गे येत होते. पण, अचानक मुंबईत आल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यांना पॅम्पच्या प्रशासनाकडून मुंबईत तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जा, अशा सूचना करण्यात आल्या. त्यानुसार हे पॅडेट आपल्या नातेवाईकांकडे होते. मात्र, लॉकडाऊन वाढत गेल्याने त्यांची गावे येण्याचे मार्ग खुंटले. सध्या मुंबईतून गावी येण्यासाठी चाकरमान्यांना सोय केली जात आहे. परंतु विद्यार्थ्यांना गावी येण्यासाठी शासनाकडून कोणतीही सोय नाही. गावी येण्यासाठी हा एनसीसी कॅडेट प्रयत्न करीत आहे. पण त्याच्या प्रयत्नाला कोणीही दात देत नसल्याने तो हतबल झाला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथील एक विद्यार्थिनी लॉ प्रवेशाच्या पूर्वतयारी परीक्षेसाठी मुंबईत गेली होती. ती ही अडकली आहे. असे अनेक विद्यार्थी मुंबईत अडकून पडले आहेत. त्यांना गावी आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. चाकरमान्यांना गावी येण्यासाठी एसटीची सोय मोफत करण्यात आली आहे. मात्र, 21 सीट असणाऱयांना मोफत एसटी सोडली जात आहे. त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांसमोर यक्ष प्रश्न ठाकला आहे.
आदित्य सावंत हा सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील आहे. मूळ कलंबिस्त येथील आहे. सध्या तो मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे गेले 50 दिवसाहून अधिक दिवस अडकून पडला आहे. त्यांने गावी सुखरुप यावे, म्हणून त्याचे कुटुंबीय प्रयत्न करीत आहेत.