नागरिकांतून समाधान : दोन वर्षांपूर्वी पावसाळय़ात कोसळली होती भिंत
प्रतिनिधी / बेळगाव
एपीएमसीमधील ज्योतीनगरकडून जाणारी भिंत मागील दोन वर्षांपूर्वी मुसळधार पावसात कोसळली होती. एपीएमसी प्रशासनाकडून ती भिंत बांधण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनेक महिन्यांपासून ही भिंत बांधावी, अशी मागणी होत होती. याची दखल घेत या भिंतीचे बांधकाम करण्यात येत आहे.
ज्योतीनगरकडे जाण्यासाठी एपीएमसी भिंतीकडून मुख्य मार्ग आहे. मागे आलेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली होती. ही भिंत जुनी असल्याने ढासळली होती. मात्र यामुळे ज्योतीनगरकडे जाणाऱया नागरिकांना मोठा त्रास होत होता. ही भिंत कोसळल्यामुळे मध्यंतरी अनेक मद्यपींचा एपीएमसी परिसरात वावर वाढला होता. त्यामुळे ही भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
एपीएमसीमधील भाजी मार्केटकडे जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता व गेट निर्माण करण्यात आले आहे. त्याला लागूनच ही भिंत कोसळली होती. त्यामुळे ही भिंत बांधावी, अशी मागणी होत होती. याची दखल घेत भिंतीचे बांधकाम करण्यात येत आहे.