नियम डावलून खासगी भाजीमार्केटसाठी परवाना देताना अधिकाराचा दुरुपयोग : चौकशीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसी येथे भाजी खरेदी-विक्रीचा व्यवहार एपीएमसीच्या नियमानुसार सुरू आहे. मात्र सर्व नियम डावलून खासगी भाजी मार्केटसाठी व्यवसाय परवाना देण्याच्यादृष्टीने एपीएमसीच्या अधिकाऱयांनी अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्दगौडा मोदगी आणि समाजसेवक सुजित मुळगुंद यांच्यासह एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱयांनी दिले आहे.
नव्याने सुरू झालेल्या भाजीमार्केटसाठी व्यवसाय परवाना देण्यासाठी एपीएमसीचे अधिकारीच कारणीभूत असल्याची तक्रार बुधवारी भ्रष्टाचारविरोधी ब्युरोकडे करण्यात आली. बेंगळूर एपीएमसी खात्याचे संचालक करीगौड, साहाय्यक संचालक महांतेश पाटील, बेळगाव कृषी उत्पन्न समितीचे सचिव के. कुडीगौड यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. भाजीमार्केटचे स्थलांतर एपीएमसी मार्केटमध्ये करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. व्यवहार सुरळीत होण्याच्यादृष्टीने 80 कोटीचा निधी खर्च करून सुसज्ज भाजीमार्केटची निर्मिती करण्यात आली आहे.
या ठिकाणी आवश्यक सुविधा दिलेल्या असतानाच खासगी भाजीमार्केट सुरू करण्यासाठी बेंगळूर एपीएमसी खात्याकडून व्यवसाय परवाना देण्यात आला आहे. सदर खासगी भाजीमार्केटच्या उभारणीस विरोध झाला होता. तसेच इमारत बांधकामास महापालिकेने परवानगी नाकारली होती. तरीदेखील या ठिकाणी इमारती उभारण्यात आल्या आहेत. आता त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी एपीएमसीने परवाना दिला आहे. मात्र सदर परवाना देण्यास एपीएमसीचे अधिकारी जबाबदार आहेत. कायदा डावलून खासगी भाजीमार्केटला परवानगी देण्यात आली. ही परवानगी देण्यास वरील अधिकारी कारणीभूत आहेत. अधिकाऱयांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. त्यांनी जमविलेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत आवश्यक चौकशी करून कारवाई करावी, अशी विनंती भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना सिद्दगौडा मोदगी, सुजित मुळगुंद, गजानन शहापूरकर, राजू पाटील, बाळाराम चव्हाण, जे. एम. सनदी, झेड. ए. हंचीनमनी आदींसह व्यापारी उपस्थित होते.
निकाल लागल्यानंतरच भाजीमार्केट सुरू
शेतकऱयांच्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. नवीन जय किसान भाजीमार्केट सुरू करण्याच्या विरोधात काही जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. धारवाड आणि बेंगळूर येथील उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागल्यानंतरच भाजीमार्केट सुरू केले आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता, शेतकऱयांना चांगला हमीभाव मिळेल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया जय किसान भाजीमार्केटचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी व्यक्त केली.