शिरोळ प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांमध्ये एफआरपीची रक्कम नाममात्र वाढवली परंतु इतर वस्तूचे दर पाचपट वाढले आहेत. त्यात पुन्हा एफआरपीचे दोन तुकडे केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे किमान शासनाने प्रति टन पस्तीशे रुपये दर द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिला.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत 2019 चा महापूर 2020 चा कोरोना 2021 चा महापुर यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह अन्य घटकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एफआरपीची रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना मारक आहे. चालू वर्षी एफआरपीची रक्कम वाढवून द्यावी, सध्या विजेचे दर, मजुरांचे दर, रासायनिक खताचे वाढलेले, दर याचा विचार केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे उसाला प्रतिटन किमान पस्तीशे रुपये दर मिळणे गरजेचे आहे. शासनाने एफआरपी दोन तुकड्यात देण्याच्या निर्णयात बदल करावा, तसेच एफआरपीमध्ये मोठी वाढ करावी अशी मागणी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली.