वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील साहित्यावर बहिष्कार घालण्यासंदर्भात लोकांची भावना लक्षात घेता एमजी मोटर्सला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे. आता कंपनी या संदर्भात फेरविचार करत असून येणाऱया काळात भारतामध्ये पुन्हा एकदा गुंतवणूक करण्याची शक्मयता व्यक्त केली जात असल्याची माहिती आहे.
एमजी मोटर्सच्या नियोजनानुसार आपल्या नवीन मॉडेलचे सादरीकरण केल्यानंतर आपला व्यवसाय वाढण्यासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. एफडीआयच्या नियमावलीनुसार आणि कंपनी गुंतवणूक करण्याअगोदर डीपीआयआयटीस मंजुरी घेणे आवश्यक आहे. या अगोदर एमजी मोटर्सने 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात केली असून ती जनरल मोटर्सचा प्रकल्प खरेदी करण्यासाठी केली आहे. कंपनी भारतामध्ये सध्या हेक्टर प्रीमियम एसयूव्हीची विक्री करत आहे.
अंतिम अधिकार
भारत सरकारकडे या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामध्ये आपल्या देशासाठी कोणती बाब योग्य व कोणती अयोग्य आहे, याचा अंतिम निर्णय भारताने घ्यावयाचा असल्याचे स्पष्टीकरण एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबडा यांनी दिले आहे.