प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटी कर्मचाऱयांकडून संप मागे घेण्याचे घोषित करण्यात आले असले तरी कोणत्या दिवसापासून कामावर रूजू व्हावे, या बाबत एकमत झालेले नाह़ी यातून मार्ग काढण्यासाठी कर्मचाऱयांकडून कोअर कमिटीची स्थापना करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱयांकडून सांगण्यात आल़े दरम्यान कर्मचाऱयांना हजर करून घेण्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांचाच अभ्यास केला जाणार आह़े त्यासाठी निकालाच्या प्रतीची प्रतीक्षा असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाकडून 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्यासंबंधी आदेश दिले आहेत़ यानंतर मागील 4 महिन्यांपासून चालणारा एसटीचा संप कर्मचाऱयांकडून मागे घेण्यात आल़ा आता रत्नागिरी जिह्यात एसटीची सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े रत्नागिरी विभागातील अडीच हजार कर्मचारी आता हजर होणार आहेत़ तर बडतर्फ कर्मचाऱयांबाबत शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े
संप मागे घेण्यात आल्याबाबत घोषणा होताच रत्नागिरी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱयांकडून जल्लोष करण्यात आल़ा तसेच ढोल-ताशांचा गजर करण्यात आल़ा तसेच मिरजोळे एमआयडीसी येथील एसटी वर्कशॉपबाहेर कर्मचाऱयांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद व्यक्त केल़ा मागील 4 महिन्यांपासून कर्मचाऱयांच्या संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले होत़े तर टप्याटप्प्याने कर्मचारी हजर होत राहिल्याने काही प्रमाणात बसफेऱया सुरू करण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े