न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासंबधी 22 फेबुवारी रोजी होणाऱया मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्यभरातील एसटी कामगारांसह सामान्य जनतेचेही लक्ष लागले आह़े मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर संपाची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
मागील 3 महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर संपावर आहेत़ याचा फटका रत्नागिरी विभागालाही बसत आहे. 3 महिन्यात सुमारे 70 कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागल़े वारंवार विनंती करूनही बहुतांश कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. ते विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत.
आतापर्यंत जिह्यात 100 हून अधिक कर्मचारी बडतर्फ तर 300 हून अधिक कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल़ी तरीही एसटी चालक व वाहक कोणताही प्रतिसाद अधिकाऱयांना देत नसल्याने संपाची कोंडी कशी फोडावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एसटीच्या प्रतिदिन 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े जिह्यात सद्यस्थितीत विविध पदांवरील एकूण 700 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान, मंगळवारी एसटी विलीनीकरणासंदर्भात उच्च न्यायालय आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आह़े त्यामुळे उद्याच संपाची कोंडी फुटून कामावर हजर राहण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आह़े