आगामी काळात कोरोनाचे व्हेरियंट येणे हे विशेष राहणार नसून मानवी शरीरच व्हेरियंटला सरावले जाणार आहे. त्यात लसीकरण महत्वाची भूमिका बजावत आहेच, यातून व्हेरियंटचा हल्ला परिणामकारक राहिल असे होऊ शकत नाही. त्यामुळे, मफत्यूची संख्या ही कमी असण्याची शक्यताच अधिक असल्याची बाब दिलासादायी ठरणार आहे.
‘ओ माय गॉड’ च्या धर्तीवर सध्या नव्या पसरत असलेल्या व्हेरियंटला‘ओ माय क्रॉन’ म्हणण्याची अजिबात घाई करु नये. हा व्हेरियंट अधिक वेगाने पसरत असला तरीही या व्हेरियंटपासून धोका कमी असण्याची शक्यता आता आयसीएमआरकडूनही सांगितली जात आहे. तर, उत्परावर्तित अवस्थेतील हा व्हेरियंट म्हणजे ही महामारी शेवटच्या टप्प्यावर असू शकते असाही एक वेगळा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या व्हेरियंटला शेवटच्या टप्प्यावरील व्हेरियंट म्हणत असलो तरीही सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
ओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी आवश्यक ती साधने मुंबईत उपलब्ध आहेत. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 17 रुग्ण आढळून आले आहेत तर मुंबईत ही संख्या 5 वर पोहोचली आहे. या रुग्णांची संख्या वाढत जाऊ शकते. राज्यात सध्या 60 हून अधिक संशयित रुग्ण आहेत. याचे नुमने ओमिक्रॉनच्या सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
मुंबई आणि पुण्याच्या प्रयोगशाळेत जिनॉम सिक्वेंसिंग करण्यात येत आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या राज्यातील 17 ओमिक्रॉन रुग्णांपैकी आतापर्यंत 7 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. तर, मुंबई 5, पिंपरी-चिंचवड 10, पुणे मनपा 1 आणि कल्याण-डोंबिवली 1 या रुग्णांचा समावेश होता.
दरम्यान, मागच्या मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस करण्यात आलेल्या परदेशी प्रवाशांच्या जिनॉम सिक्वेंसिंगमधून एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, एखाद्या व्हेरियंटची ज्या ठिकाणी अचानक संख्या वाढते त्या ठिकाणी तो अधिक प्रमाणात पसरणे आवश्यक असताना तसे आढळून येत नाही. आपल्या राज्यातही तसे दिसून येत नसल्याचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगत आहेत. शिवाय, तेवढय़ा मोठय़ा संख्येत रुग्ण आढळून न आल्यास त्या विशिष्ट व्हेरियंटचा परिणाम काय होत आहे हे समजून येत नसल्याचे मतही अभ्यासक तज्ञ मांडत आहेत. नेमके काय होत आहे हे समजण्याआधीच एखाद्या व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. त्यामुळेच, यावर सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडण्यात येत आहे. ओमिक्रॉनबाबत सखोल सिक्वेंसिंग होणे गरजेचे आहे. 100 पॉझिटिव्ह रुग्णांमधून पाच टक्के रुग्णांचे सिक्वेंसिंग होणे गरजेचे आहे. यातून व्हेरियंटचे गुण वैशिष्टय़ समोर येऊ शकते.
हा व्हेरियंट एकदम नवीन असून नेमकी कोणती प्रथिने या व्हेरियंटला कारणीभूत आहेत ही सर्व माहितीदेखील पुढे येणे आवश्यक आहे. त्याला लागून व्हेरियंटमुळे होणारे परिणामदेखील समोर येणे अजून बाकी आहे. दरम्यान, भारतीय रुग्ण या व्हेरियंटला सरावले आहेत का किंवा लसीकरणामुळे व्हेरियंटचा प्रभाव कमी होत आहे का याकडेदेखील लक्ष देणे उचित ठरेल असे सांगण्यात येत आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत परदेशात कोरोनाची पहिली, दुसरी, तिसरी लाट आणि चौथी ओमिक्रॉनची लाट आली आहे. या ठिकाणी प्रभावही दिसून येत आहे. मात्र, भारतात पहिली, दुसरी लाट प्रभावीपणे दिसून आली. तर तिसरी लाट अद्याप तरी आली नाही. याला कारण प्रत्येक प्रदेशातील मानवी रोग प्रतिकार शक्ती वेगवेगळी असू शकते. यातून भारतीय रोग प्रतिकार शक्तीचा अभ्यास होणेही आवश्यक आहे. कोणत्याही आजाराचा शरीरातील शिरकाव आणि परिणाम रोग प्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे. शिवाय, रोग प्रतिकार शक्तीसोबत लसीकरण झालेले असल्याने त्याचा परिणाम अजून तरी चांगला दिसून येत आहे. या सर्व मुद्यावरुन ओमिक्रॉनचा प्रभाव भारतीयांमध्ये कसा असू शकतो, याचा अभ्यास नोंद करणे आवश्यक आहे.
कोरोनावर लस निघण्यास सहा महिन्याचा कालावधी लागला. या काळात मफत्यूच अधिक पाहण्यास मिळाले. मात्र, एकदा लस आल्यास मफत्यू दर कमी होऊन सध्या राज्यातील मफत्यू दर 2.12 एवढा टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना नव्या व्हेरियंटची नवी लस असा कोणीही विचार करु नये असे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञांकडून सुचविण्यात येत आहे. भारतात सध्या कोरोनावरील तीन लस उपयुक्त आहेत. नव्या आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटवर या लसी उपयुक्त असल्याचा निर्वाळा देण्यात येत आहे. याला कारण म्हणजे या लसी बाकीच्या प्रोटीनला कव्हर करत आहेत. यापुढे कोरोनाचा नवा उपप्रकार येणे ही बाब विशेष राहणार नसून मानवी शरीरच व्हेरियंटला सरावले जाणार
आहे.
तसेच, मानवी शरीरावरील व्हेरियंटचा हल्ला परिणामकारक राहिल असे होणार नसून लस किंवा मानवी रोग प्रतिकार शक्तीतून मफत्यूची संख्या ही कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याही व्हेरियंटचा परिणाम कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सोबतीला लसीकरण घेण्यावर भर देण्यात यावा, असा आरोग्यदायी सल्लाही देण्यात येत आहे.
कोरोना ओमिक्रॉन व्हेरियंटची कोंडी करण्यासाठी विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. 1 नोव्हेंबरपासून परदेशातून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली. तर, राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमान तळावर तपासण्या करण्यात येत आहेत. तसेच, विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून दररोज नमुने प्रयोग शाळेत जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत, यांचे अहवाल समोर येत आहेत.
सध्या संख्या मंद गतीने नोंद करण्यात येत आहे. मात्र हीच वेळ सावधगिरी बाळगण्याची असून लसीकरण आणि आता लस पूर्ण झालेल्यांना बुस्टर डोस देण्याकडे गरज असल्याची मागणी वाढत असल्याचे दिसून येते.
राम खांदारे