ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी राजसभेत बॉलीवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचा आरोप केला.
त्या म्हणाल्या, बॉलीवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य केलं. देशात अमेक समस्या समोर आलेल्या असताना त्यावेळीसुद्धा बॉलिवूड कलाकार मदतीसाठी पुढं येतात. पण, ज्यावेळी कलाविश्वाचीच बदनामी करण्यात येते तेव्हा मात्र फार वेदना होतात, असे ही त्या यावेळी म्हणाल्या.
यावर कंगना रानौतने एक ट्विट करीत आक्रमक उत्तर दिले आहे. ती आपल्या ट्विट मध्ये म्हणते की, जया जी, आपण तेव्हाही असेच म्हटले असते का? माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टी एन जे मध्ये मारहाण झाली असती, ड्रग्ज दिले गेले असते आणि छेडछाड केली असती? तसेच अभिषेकला सतत त्रास दिला जात असता, आणि सुशांत प्रमाणेच एके दिवशी तो फाशावर लटकलेला दिसला असता? तर तुम्ही असेच बोलला असता का ? असे प्रश्न कंगना ने विचारले आहेत. तसेच आमच्या बाबत देखील सहानुभूती दाखवा असेही ती म्हणाली आहे.