केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकार लवकरच कंपनी कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, कारण काही नियमांचे होणारे उल्लंघन आणि गैर मार्गानी होणारे व्यवहार, भारतीय कंपन्यांना विदेशी शेअर बाजारात संधी आणि व्यवसायांमध्ये एकसूत्रता आणून त्याला चालना देण्यासाठी नवीन कंपनी कायद्यात संशोधन करण्यासाठी अध्यादेश आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
भारतीय कंपन्या आपल्या कंपन्यांची नोंदणी थेट विदेशी शेअर बाजारात करु शकणार आहेत. भारतीय कंपन्यांसाठी हा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंपनी अधिनियम 2013 मधील संशोधनाशी संबंधीत विधेयक संसदेमध्ये प्रलंबित आहे. यामध्ये अधिनियमाच्या क्रियान्वयन संबंधीत कॉर्पोरेट प्रकरणे मंत्रालयाकडून सोडविली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक निधीची घोषणा केली आहे. यातील पाचव्या टप्प्यातील आर्थिक निधीची घोषणा करताना कंपनी अधिनियम संशोधनासाठी अध्यादेश आणण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
विविध नियमात बदल
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व(सीएसआर) बाबतची चुकीची माहिती देणे, संचालक मंडळाचा अपर्याप्त अहवाल, शेअर बाजाराला माहिती देण्यास उशीर करणे, वार्षिक सर्वसाधारण बैठकीस उशीर करण्यासोबत अन्य समस्या आदी बाबी येत्या काळात कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. केंद्राrय मंत्रीमंडळाकडून मार्चमध्ये कंपन्यांच्या कायद्यात 72 वेगवेगळय़ा बदलांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.