वन विभाग भरारी पथकाची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
वनविभागाच्या भरारी पथकाने कट्टणभांवी येथे दोन कासव जप्त केले आहेत. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून यासंबंधी एकाला अटक करण्यात आली आहे.
कट्टणभांवी येथील अर्जुन कल्लाप्पा नाईक (वय 45) याला अटक करण्यात आली आहे. भरारी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, आर. बी. यरनाळ, एस. आर. बागाई, के. डी. हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
कोणत्या तरी जंगलातून आणलेले दोन कासव अर्जुनने गावात आपण बांधत असलेल्या नव्या घराजवळ पाण्याच्या टाकीत ठेवले होते. ही माहिती मिळताच अचानक छापा टाकून दोन्ही कासव जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
एक कासव 2 किलो 100 ग्रॅम वजनाचे तर दुसरा कासव 1 किलो 600 ग्रॅम वजनाचा आहे. या संबंधी कलम 9, 39, 44, 49(एबीसी) 50, 51 वन्य जीवी संरक्षण कायदा 1972 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.