प्रतिनिधी / बेळगाव
कट्टणभावी शिवारात रविवारी दिवसाढवळय़ा एक गवीरेडय़ाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱयांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. परिसरातील गावातून दवंडी मारून जागृती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील शिवारात गवीरेडय़ाचा कळप धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. तातडीने वनविभागाच्या अधिकाऱयांनी गावाला भेट देऊन शेतकऱयांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
ऐन सुगी हंगामात गवी रेडय़ाने धुमाकूळ घातल्याने सदानंद मोरे यांच्यासह अन्य शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गवी रेडय़ाने ज्वारी पिकांसह भात पिकांचे नुकसान केले आहे. ऐन सुगी हंगामात गवीरेडय़ाचे दर्शन झाल्याने शेतकऱयांसह महिला शेताकडे जाण्यासाठी घाबरत आहेत. परिसरातील शेतवडीतून एक गवीरेडा जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.वनखात्याच्या अधिकाऱयांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली असून नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई देण्याचे आश्वासन वनखात्याने दिले आहे.
ऐन सुगी हंगामात धुमाकूळ घालणाऱया गवीरेडय़ाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे. परिसरात गवीरेडा पुन्हा नजरेस पडल्यास तातडीने काकती रेंज ऑफिसला कळवावे, असे आवाहन वनखात्याने केले आहे.