प्रतिनिधी /पणजी
कदंब परिवहन महामंडळातर्फे (केटीसी) येत्या 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्र व कर्नाटकात आंतरराज्य बससेवा सुरु करण्यात येणार असून उर्वरित आंतरराज्य मार्गावरही सेवा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती महामंडळाचे उपसरव्यवस्थापक एन. एम. नाईक यांनी दिली आहे. कोरोना महामारीमुळे या सेवा बंद होत्या.
पणजी – मुंबई – बोरीवली (व्होल्वो), मडगांव – पुणे (एसी स्लीपर), वास्को – सोलापूर (आरामबस), पणजी – बंगलोर (व्होल्वो), मडगांव – पुणे (आरामबस), मडगांव – मुंबई – धोबीतलाव (एसी स्लीपर) या सहा बसगाडय़ांची सेवा 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
पणजी – शिर्डी, पणजी – हैदराबाद, पणजी – म्हैसूर या बसगाडय़ा लवकरच सुरु करणार आहेत. प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक आहे याची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. महामंडळाने पणजी – मडगांव, मडगांव – कारवार या मार्गावर इलेक्ट्रिक बसगाडय़ा सुरु केल्या आहेत.
ऑनलाईन, ऑफलाईन तिकिट आरक्षणासाठी महामंडळाने दिलेल्या संपर्क क्रमांक फोनवर संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाने केले आहे. कदंब महामंडळाची खालील सर्व कार्यालये बसगाडीच्या आरक्षणासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली आहेत. प्रवाशांनी फोनवर संपर्क साधावा, असे महामंडळाने कळवले आहे.
आरक्षणासाठी संपर्क क्रमांक
- पणजी (2438034)
- फोंडा (2311050)
- मडगांव (2714670)
- म्हापसा (2262161)
- सांखळी (2366511)
- वास्को (2513505)
- पुणे (02024126218 / 9850431152 / 9860483838)
- बोरीवली (9920431262)