प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कन्याकुमारी येथून काश्मिरपर्यंत धावत निघालेल्या दोन युवकांचा सत्कार मंगळवार दि. 2 फेब्रुवारी रोजी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सकाळी 8 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आजी, माजी, नौसैनिक, सैनिक संघटनेने दिली.
राजस्थान येथील रामरतन, हरियाणा येथील संजयकुमार या दोन युवकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा, तंदुरुस्तीचा संदेश देत कन्याकुमारी येथून दि. 11 जानेवारीपासून धावण्यास सुरुवात केली आहे. 4 हजार 431 किमीचा प्रवास करून ते 8 मार्च रोजी काश्मिर येथे पोहोचणार आहेत. 11 राज्य, 91 मोठी शहरे, 1 हजारपेक्षा अधिक खेडय़ांमधून त्यांचा प्रवास होत आहे.
सातारा येथील आजी, माजी, नवसैनिक संघटनेच्यावतीने उद्या मंगळवार दि. 2 रोजी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये त्यांचा सकाळी 8 वा. सत्कार करण्याचा येणार असल्याची माहिती सूर्यकांत पडवळ (आप्पा), प्रमोद कणसे, अशपाक पटेल, राजेंद्र निकम यांनी दिली. या सत्कार समारंभाला आजी-माजी नौसैनिक, सैनिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.