कचऱयाच्या ढिगाऱयामुळे परिसरात दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वार्ताहर / परळी
करंजेनाका येथील पुलाजवळील कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. कचऱयामुळे स्थानिक नागरिक अक्षरशा वैतागून गेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे निदर्शनास येत आहेत या कचऱयाच्या ढिगाऱयामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील कचरा समस्या सुटणार कधी? असा वारंवार सवाल स्थानिकांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे.
प्रशासनामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेअंतर्गत स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनामार्फत आदेश देण्यात येतात मात्र करंजेनाका परिसरातील कचऱयाची समस्या गेल्या कित्येक दिवसांपासून सुटलीच नाही. कचऱयाच्या ढिगाऱयामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळू लागले आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातारा शहराचा विस्तार झपाटय़ाने वाढत आहे त्यातच करंजे नाका परिसरातील वाढते शहरीकरण यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावण्याकरिता विशेष पावले उचलली पाहिजेत मात्र या परिसरातील समस्या येथील त्रुटी अडचणी पाहिल्यानंतर एकूणच त्याकडे स्वतंत्रपणे लक्ष देण्याची गरज वारंवार प्रथीत होत आहे. इथल्या कचरा व्यवस्थापनाकडे मूलभूत गरज म्हणून पाहायला हवे व ग्रामपंचायती मार्फत यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
करंजे नाका येथून मोळाचा ओढा या रस्त्यानजीक असलेल्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे पहावयास मिळतात स्थानिक दुकानदार हे प्लास्टिक बाटल्या केर कचरा आणून टाकत आहेत तसेच चिकन मटन दुकानातील टाकाऊ पदार्थ यात कचऱयामध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी मध्ये वाढ होत आहे. सध्या कोरेनामुळे सर्वजण मास्कचा वापर करत आहे तसेच सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापरही जोरात सुरू आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वजणच खबरदारी घेऊ लागले आहेत पण या परिसरात असलेल्या कच्रयामुळे दुर्गंधी पसरत आहे याकडे करंजे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
भटक्या कुत्र्यांचा मोठा संचार
कचऱयामध्ये चिकन मटणाचे टाकाऊ पदार्थ टाकण्यात येत असल्याने ते खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा हे याठिकाणी मुक्तपणे वावरत असतो. रस्त्यावरून येणाऱया वाहनधारकांवर ही कुत्री अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडतात. बहुतांश वेळा या महामार्गावरून जाताना कित्येक वाहनधारकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार खाली पडले सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. तसेच रात्रीच्या वेळी या भटक्या कुत्र्यांची फौजच जणू या रस्त्यावर निदर्शनास पडते.