बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना दररोज नवा विक्रम करत आहे. दिवसागणिक राज्यात कोरोनाची संख्या वाढतच आहे. दररोज वाढणारी रुग्णांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. मंगळवारी कोरोना संसर्गामुळे १४९ जणांचा बळी गेला. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ हजाराच्या वर गेली आहे. दरम्यान राज्यात मंगळवारी २१,७९४ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ४५७१ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत.
सध्या राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या १५,९१५८ वर पोहोचली. मंगळवारपर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण १३,६४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शरि जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात १३७८२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २०३५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहे.