बेंगळूर/प्रतिनिधी :
५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी आदिचंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंदनाथ स्वामी यांना आमंत्रित केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी बसवराज यांनी रविवारी विजय नगरमधील आदिचंचनगिरी शाखा मठात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने निर्मलानंदनाथ स्वामी यांना निमंत्रण पत्र दिले.
या दरम्यान निर्मलानंदनाथ स्वामी यांनी या कार्यक्रमासाठी आदिचंचनगिरी तीर्थक्षेत्रातील मातीने भरलेल्या कलश त्यांच्याकडे सुपुर्द केला. देशातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या प्रमुख नद्यांचे पाणी आणि माती पायाभरणीसाठी साठवले जात आहे. स्वामी निर्मलानंदनाथ यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे म्हंटले आहे.