बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारकडून १७ नोव्हेंबरपासून युजी आणि पीजी (पदव्युत्तर) वर्ग पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतरही शिक्षण विभागाने प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) जारी केलेली नाही. अनेक महाविद्यालयांनी महाविद्यालय सुरू करण्याबाबत कोणतेही शासकीय आदेश जारी केलेले नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संस्था गोंधळलेल्या आहेत. तसेच विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काही सांगण्याच्या स्थितीत नाहीत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच एसओपी सोडण्यात येईल.
राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू यांनी यूजी आणि पीजी महाविद्यालये १७ नोव्हेंबरपासून सुरू होतील, असा निर्णय राज्य सरकारने २८ ऑक्टोबर रोजी घेतला होता. असे असूनही शिक्षण विभाग आणि राज्य सरकारने अद्याप याबाबत अधिकृत आदेश काढलेला नाही.
अन्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माहितीनुसार महाविद्यालये सुरु होण्याबाबत काही स्पष्टता नाही. त्यामुळे ते इतर राज्ये आणि देशांतील विद्यार्थ्यांना परत जाण्यास सांगण्याच्या स्थितीत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन क्लासचा पर्याय देखील आहे. दरम्यान वर्ग हाताळणे सोपे नाही. विद्यार्थ्यांच्या खाण्याबरोबरच निवासाचीही व्यवस्था करावी लागेल. सात महिन्यांनंतर सर्व काही पुन्हा व्यवस्थित होण्यासारखे आहे आणि त्यास वेळ लागेल.