ऑनलाईन टीम / ठाणे :
उल्हासनगर शहर व महापालिकेत वर्चव असलेल्या माजी आमदार पप्पू कलानी यांच्या कुटुंबासह 22 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ हाती बांधले. आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी पप्पू कलानी यांच्या सून पंचम कलानी यांनी महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम कलानीने राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पंचम कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना जितेंद आव्हाड म्हणाले, कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळणार असून, उल्हासनगरातील राजकीय समीकरणे बदलतील. महापालिकेवर आता राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल.