प्रतिनिधी / मुंबई
इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत झालेल्या आंदोलनात युवा नेते राज्यमंत्री विश्वजीत कदम सायकल चालवत. सहभागी झाले.
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभरातील जनता महागाईत होरपळत आहे. त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षातर्फे त्यांना निवेदन देण्यात आले राज्यपालांची भेट घेण्यासाठी जाणारे शिष्टमंडळ सायकल मार्च काढून राजभवन येथे दाखल झाले.
मोदी सरकारने निर्माण केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या कृत्रिम महागाईविरोधात या आंदोलनादरम्यान जोरदार आवाज उठवण्यात आला.