प्रतिनिधी /वाळपई
गेल्या दोन महिन्यापासून उन्हाळ्य़ात पडणाऱया अवकाळी पावसाचा परिणाम काजू उत्पादनावर मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील काजू उत्पादकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा अशा आशयाचे पत्र पर्ये मतदारसंघाच्या आमदार दिव्या राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या पत्राची दखल घेऊन सरकारने काजू उत्पादकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी सदर पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
यंदाचे काजू उत्पादन अवघे 30 टक्के झालेले आहे. अवेळी पाऊस पडू लागल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. गेल्या आठ दिवसात तीन वेळा पाऊस लागला. याची गंभीर दखल घेऊन पर्ये मतदारसंघाच्या आमदार दिव्या राणे यांनी मुख्यमंत्र्यांना खास पत्र लिहिले आहे. सदर पत्राच्या माध्यमातून काजू उत्पादकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. जवळपास 70 टक्के काजू उत्पादक आपले आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे काजू उत्पादनावर करतात. काजू उत्पादन मोठय़ा प्रमाणात घसरले असून उत्पादकांची आर्थिक स्थिती बिकट होण्याची भीती नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे सरकारने गांभिर्याने विचार करावा, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.