मधमाशांनी 12 पोळी बांधली : डिवचल्यास नागरिकांचा जीवावर बेतण्याची भीती
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिकेच्या व्यवस्थापनाला एक प्रकारचे आव्हान देत प्रशासकीय इमारतीवरच मधमाशांनी 12 पोळी बांधली आहे. यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाऱया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मधमांशांचा कोणीतरी डिवचल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
पालिकेनेच पुढाकार घेऊन सदर मधमाशांचे पोळे त्वरित हटविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने पालिकेचा बेजबाबदारपणा समोर आला आहे, असा आरोप नागरिकांतून होत आहे.
वाळपई नगरपालिकेची प्रशासकीय इमारत नुकतीच बांधण्यात आलेली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन वर्षांपूर्वी सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले होते. यामुळे या इमातीत वर्दळ असायची. मात्र गेल्या वर्षभरापासून सदर थिएटर बंद झालेले आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर व तळमजल्यावर व्यावसायिक गाळे तयार केले आहेत. मात्र अजूनही रिकामीच आहेत. यामुळे याठिकाणी नागरिकांची वर्दळ बंद झालेली आहे. याचाच फायदा घेऊन मधमाशांनी पोळे तयार करून इमारतीत बस्तान मांडले आहे. गेल्या दीड वर्षांपासून मधमाशांनी पोळे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 12 पोळी त्याठिकणी झाली असून मोठय़ा प्रमाणात मधमाशा सदर भागांमध्ये फिरत असल्याचे चित्र आहे. सदर मधमाशांना कोणीतरी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास इमारतीच्या आसपास परिसरातील नागरिकांचा जीव धोक्मयात येण्याची शक्मयता आहे. महत्त्वाची बाब अशी की ज्या इमारतीच्या मागच्या बाजूला नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्याच इमारतीत मधमाशांनी अशाप्रकारे इमारतीचा ताबा घेणे व त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे.
लवकरच पोळे नष्ट करणार : मुख्याधिकारी
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर माधमाशांची पोळी नष्ट करण्यासाठी तज्ञ इसमाच्या शोधात आहोत. शक्मय तेवढय़ा लवकर नष्ट करून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
पालिकेकडून गंभीर दखल : नगराध्यक्ष
नगराध्यक्ष सेहझीन शेख यांच्याशी संपर्क साधला असतात सदर पोळे नष्ट करण्याच्या संदर्भात नगरपालिका गंभीर आहे. कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही. येत्या काही दिवसांतच मधमांशाचे पोळे नष्ट करण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.