रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून टाकल्याचा अंदाज
कणकुंबी /वार्ताहर
कालमणी येथील जांबोटी कणकुंबी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतामध्ये ट्रकभर गोमांस टाकण्यात आले आहे. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तिंनी गोमांस भरलेल्या पिशव्या ट्रक भरून आणल्या व येथील बळजी यांच्या शेतात टाकून पोबारा केला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी भीमराव भरणकर हे जनावरे चारावयास घेऊन गेले असता सदर प्रकार उघडकीस आला,
जांबोटी कणकुंबी या मुख्य रस्त्यापासून केवळ शंभर फूट अंतरावर कालमणी येथील शेतकरी बळजी बंधू यांच्या शेतामध्ये अज्ञातानी गोमांस भरलेल्या ढीगभर पिशव्या टाकल्या आहेत. भीमराव भरणकर जनावरे चारावयास घेऊन गेले असता त्यांना बळजी यांच्या शेतात पिशव्यांचा ढीग दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, त्यामध्ये गोमांस असल्याचे आढळून आले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र याची माहिती ‘तरुण भारत’ च्या प्रतिनिधीला कळताच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदर प्रकारात तथ्य असल्याचे समजले.
गोमांस आले कुठून ?
सदर भाग जंगलमय असून, शेती पड असल्याने त्याठिकाणी माणसांची वर्दळ कमी आहे, दोन दिवस जंगली प्राण्यांनी त्यावर ताव मारला. डुक्कर, कावळे, कुत्री व इतर प्राण्यांनी पिशव्या फाडून गोमांस विस्कटून टाकले असल्याचे निदर्शनास आले. सदर गोमांस गेल्या तीन दिवसापासून त्या ठिकाणी पडलेले असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. एवढे ट्रक भरून गोमांस नेमके कुणी व का टाकले हा अनुत्तरीत प्रश्न आहे. सदर मांस चोरीचे आहे की, पोलिसांना याचा सुगावा लागणार या भीतीने शेतात टाकण्यात आले. याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. गोमांस बेळगावहून की गोव्याहून आणले होते याचा उलगडा होणे गरजेचे आहे. ते जागेवरच कुजले तर कालमणी गाव परिसरात रोगराई पसण्याची शक्मयता नाकारता येत नाही. यासाठी गोमांसाची विल्हेवाट लावून पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी कालमणी ग्रामस्थांनी केली आहे.
कालमणी येथे ढाण्या वाघाचे दर्शन
कालमणीच्या जंगलात वारंवार ढाण्या वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी श्रीकांत भरणकर व दिनकर भरणकर यांच्या दृष्टीला वाघ पदिसत आहे. कालमणीनजीकच्या कावळी नाल्याच्या बाजूला मांस पडलेल्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले. वाघ गेल्या चार आठ दिवसापासून कालमणीच्या जंगलामध्ये फिरत असून अनेक लोकांना तो दिसला आहे,तर येथील पांडूरंग सुतार यांची म्हैस वाघाने ठार केली, मात्र वनखात्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून काहीच केलेले नसून शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत ,जंगली प्राण्यांच्या भितीने गावातून बाहेर पडणं मुश्कलि झाले असून पंधरा दिवसापूर्वी ओलमणी येथे मिळालेला किंगकोब्रा जांबोटी वनखात्याच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने कालमणीच्या जंगलात सोडला,सदर सोडलेला किंगकोब्रा लोकांना जंगलात अधून-मधून दृष्टीस पडत आहे,एकाबाजूला वाघ,अस्वल,गविरेडे या जंगली प्राण्यां बरोबरच वनखात्याने सोडलेला किंगकोब्रा कालमणीच्या नागरिकांना भितीदायक ठरला आहे, वनखात्याने जाणून-बुजूनच कालमणी जंगलात,लोकवस्ती असलेल्या भागात सोडण्यामागचा उद्देश काय आहे ?जर किंगकोब्रा सोडायचाच होता तर आमगाव,चापोली किंवा गवाळीचया घनदाट जंगलामध्ये सोडला असता तर बरे झाले असते, मात्र वनखात्याची उदासीनता,यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला नसता परंतु वनखात्याने जाणून-बुजून हा प्रकार केल्याने कालमणी ग्रामस्थामधून जांबोटी वनखात्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे,आता गेल्या चार दिवसापासून दृष्टीस पडणारया वाघामुळे जर एखादा अनर्थ घडला तर त्याला जबाबदार कोणाला धरावे ?असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे,चार दिवसापूर्वी पांडुरंग सुतार यांची म्हैस वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेली असताना वनखात्याने कालमणीच्या लोकांना वाघाबद्दल सतर्क राहण्याच्या सूचना देणे जरूरीचे होते मात्र वनखाते याबाबत दुजाभाव करत आहे,असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे,गेल्या पाच-सहा वर्षापासून कालमणी, तोराळी,जांबोटी, व इतर गावांमध्ये माकडानी धुमाकूळ घालून शेतकऱयांच्या व नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान केले आहे,परंतु वनखात्याकडून याबाबत दुर्लक्ष केले जात असून बागायती पिकांबरोबर दरवषी कौलारू घरांचं होणारे नुकसान लक्षात घेता,शेतकऱयांना आणि ग्रामस्थांना वनखात्याकडून नुकसान भरपाई मिळणे जरुरीचं आहे,वाघ,डुक्कर,किंग कोब्रा आणि माकडे यासारख्या प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असताना वनखाते काहीच करू शकत नाही हा वनखात्याचा निष्काळजीपणा दिसून येतो,आता यापुढे नागरिकांनाच रस्त्यावर उतरायची वेळ येणार आहे तेव्हा प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांना जंगली प्राण्यांपासून अभय द्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे,
रस्त्याच्या दुतर्फा कचरा नेहमीचाच ङ
बेळगाव चोरला पणजी या रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून स्थानिक नागरिक आणि जनावराना नेहमी त्रासदायक ठरत आहे,विशेषतः किणये पासून बैलूर,कुसमळी,जांबोटी,कालमणी,चिखलेफाटा,कणकुंबी ते चोरला हद्दीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल मधला कचरा,एखाद्या दुकानातला कचरा,भाजी मार्केट,किंवा मंडईमधील कचरा असे वेगवेगळे कचरे टाकण्यासाठी जांबोटी कणकुंबी भागाचाच नेहमी का वापर केला जातो?या कचऱयामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरणाला सामोरे जावे लागते, तसेच स्थानिक शेतकऱयांच्या जनावरांना या प्लॅस्टिकयुक्त कचरा खालयामुळे आजारी पडत आहेत असून जंगली प्राणी माणसं जनावर यांना त्या टाकलेल्या कचऱयाचा अतिशय त्रास होत आहे बेळगाव गोवा परिसरांमधून कचरा टाकण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे जांबोटी कणकुंबी भाग, रस्त्याच्या दुतर्फा कचरा बाजूला टाकण्याचे असे प्रकार गेल्या सात-आठ वर्षांपासून नेहमी घडत असून प्रशासनाला अद्याप कचरा टाकणारी एकही व्यक्ती मिळाली नाही याचेच अजब वाटते,काहीवेळा स्थानिक नागरिक सुद्धा याकडे दुर्लक्ष करतात,परंतु असे प्रकार भागाच्या दृष्टीने अतिशय वाईट आहेत,केवळ कचऱयाच्या बाबतीतच नव्हे तर शहरी भागातील पाळीव डुक्कर,माकडं किंवा इतर त्रास दायक ठरणारी जनावरे जांबोटी भागांमध्येच का सोडली जातात हा अनुत्तरित प्रश्न आहे,यापुढं नागरिकांनी दक्ष राहणे जरुरीचे असून असल्या गैरप्रकारांना अजिबात वाव दिला जाऊ नये अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे,जर एखादी व्यक्ती असा कचरा टाकत असेल तर मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढून पोलिसांना पाठवावा नसेल तर स्थानिक नागरिकांना याची माहिती द्यावी त्यामुळे,यापुढे होणाऱया गैरप्रकारांना आळा बसेल,अन्यथा असे प्रकार चालूच राहणार,