वार्ताहर /किणये
विठ्ठल-रखुमाई युवक मंडळ किणये, यांच्यावतीने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या उपक्रमाकरिता गुरुवार दि. 17 रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस लहान गटाची बैलगाडी शर्यत झाली. शनिवार दि. 19 व रविवार दि. 20 असे दोन दिवस मोठय़ा गटासाठी बैलगाडी शर्यत होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी डुकरे होते. लहान गटाच्या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन ग्रा. पं. सदस्य हेमंत पाटील यांच्या हस्ते तर मोठय़ा गटाच्या शर्यतीचे उद्घाटन ग्रामीण युवा नेते जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते देवतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक समरसेन पाटील यांचे शेतकऱयांना मार्गदर्शनपर भाषण झाले. सूत्रसंचालन पुंडलिक दळवी यांनी केले. लहान गटासाठी अनुक्रमे 9000, 7000, 6000, 5500, 5000, 4500, 4000, 3000, 2500, 2000, 1500, 1200, 1000, 550 रु. अशी बक्षिसे आहेत. मोठय़ा गटासाठी अनुक्रमे 21 हजार, 18 हजार, 16 हजार, 14 हजार, 10 हजार, 9000, 7000, 6000, 5500, 5001, 5000, 4000, 3501, 3001, 3000 रुपये अशी 17 बक्षिसे व लकी नंबरचे बक्षीस 2500 रु. ठेवण्यात आले आहे. अधिक माहिसाठी 7022265815 किंवा 9110418703 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.