प्रतिनिधी / घुणकी
किणी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या असल्याची माहिती पॅनेलप्रमूख संजय पाटील व अॅड. एन.आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गावच्या सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्यात सामंज्यसता या उद्देशाने संपूर्ण गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून किणी गावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध म्हणून जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून नावलौकिकास यावे आणि शासनाकडून गावच्या विकासासाठी विविध माध्यमातून विकास निधी मिळावा आणि कटुता टळावी. यासाठी आमचे प्रयत्न असून अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज माघारी घेऊन बिनविरोधसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. १७ पैकी ६ जागेवर एकच उमेदवार असल्याने ६ सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ११ जागेवर एकाहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
एकमेकातील कटुता टाळून शासनाच्या योजना गावच्या एकत्रित विकासासाठी राबविणे. राष्ट्रीय पेयजल योजना, ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम योजना, ग्रीन व्हिलेज योजना अशा विविध प्रकारच्या योजनातील सहभाग नोंदवून अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन केले.
बिनविरोध झालेले सदस्य
प्रभाग क्रमांक-१ : रेश्मा बंदेनवाज मुजावर
प्रभाग क्रमांक-२ : अशोक सहदेव माळी.
प्रभाग क्रमांक-३ : प्रियांका कुंतुनाथ मगदूम व विद्या विजय पाटील
प्रभाग क्रमांक-४ सुशीला वैभव कुंभार
प्रभाग क्रमांक-५: हसीना दस्तगीर पेंढारी
या पत्रकार परीषदेस माजी सरपंच बाळगोंडा पाटील, महावीर पाटील, विक्रांत पाटील, हंबीरराव पाटील, हर्षद पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी चव्हाण, अमित दणाणे, राहुल जाधव उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग अंगीकारण हे किणीचे वैशिष्ट
निवडणुका पुरते राजकारण परत एकत्रितरित्या गावगाडा चालवणारे गाव अशी वेगळी ओळख आपल्या कार्यातून करून दिली आहे. यातून सर्व गट. तट. पक्ष विसरून किणी शिक्षण प्रसारकचे हायस्कूल सुवर्णमहोत्सवी किणी विद्यार्थी मंडळ व त्यांचा दिपावली क्रिडा महोत्सव, शेती पाणी पुरवठा संस्था, सेवा संस्था, दूध संस्था कार्यरत आहेत. तर सर्व धर्मिय कार्यक्रम सण समारंभ व सर्वांचा सहभाग ठरलेला असतो. पूर्वीपासून गावच्या विकासासाठी राजकिय मतभेद बाजूला ठेवून काम करणेच्या पायंडया मुळे सहकारमहर्षि कै तात्यासाहेब कोरे यानी वारणा उद्योग समूहाच्या नवीन संस्थांच्या शाखा किणी येथूनच सुरु करुन त्याच्या यशानंतर इतरत्र संस्थांचे जाळे विस्तारले.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध मुळे मिळणार १ कोटीचा विकास निधी. ग्रामपंचायत निवडणुक बिन थिरोध झालेस खा.धैर्यशील माने व आ राजू बाबा आवळे प्रत्येकी २५ लाख . तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रोफ यांचेकडून ५० लाख रुपयेचा निधी गावच्या विकास कामासाठी मिळणार आहे.