प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आल्याने शनिवारी व रविवारी काही किरकोळ वर्दळ वगळता बाजारपेठेत शांतता पहायला मिळत आहे. रविवारी शहरातील दुकाने, मॉल, हॉटेल व इतर व्यवहार बंद राहिल्याने रस्ते ओस पडले होते.
शहरातील रविवारपेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, काकतीवेस रोड, शनिवारखूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी रस्ते मोकळे पहायला मिळाले. रहदारी थांबविण्यासाठी पोलिसांनी बाजारपेठेतील विविध मार्गावर बॅरिकेड्स उभारल्याने अत्यावश्यक गोष्टीसाठी ये-जा करणाऱया वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागला, एरवी गजबजणाऱया बाजारपेठेत विकेंड काळात शांतता दिसून येत आहे. काही दुकाने, भाजी विपेते वगळता सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे.
मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठेत काही दुकाने खुली करण्यात आली होती. मात्र ग्राहक नसल्याने व्यापारी दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षाच करावी लागली. सकाळच्या सत्रात काही प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली. मात्र दुपारनंतर रस्ते मोकळे दिसून आले. रविवारपेठेत काही दुकानदारांनी अवजड वाहने लोड आणि अनलोड केली. रहदारी कमी असल्याने माल भरणे आणि उतरणे अशी कांही किरकोळ कामे सुरू होती.