अतुल काळसेकर यांची माहिती
वार्ताहर / कणकवली:
केंद्र शासनामार्फत किसान क्रेडिट कार्ड योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मच्छीमार, दुग्धव्यावसायीक, कुक्कुटपालन, शेतकरी या सर्वांना ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेत जिल्हय़ातील जनतेला खऱयाअर्थाने आत्मनिर्भर होता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केले आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱयांना शेतकरी व बागायतदारांना सात टक्के कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मुदतीत परतफेड केल्यास केंद्र सरकारकडून तीन टक्के, राज्य सरकारकडून तीन टक्के व बँकांकडून एक टक्के व्याज माफ करण्यात येते. त्यामुळे शून्य टक्के व्याजदर पडतो. केवळ शेतकऱयांसाठी असलेली किसान क्रेडिटकार्ड ही योजना आता मच्छीमारांसह दुग्ध व्यावसायीक व कुक्कुटपालन व्यावसायीकांनाही उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याचा जिल्हावासियांना फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेतल्यास व मुदतीत त्याची परतफेड केल्यास केंद्र सरकारने तीन टक्के व्याज सवलत जाहीर केली आहे. मात्र, राज्य सरकारने आपल्या हिश्श्याची तीन टक्के रक्कम व्याज सवलत जाहीर केली नसल्याने व्यावसायिकांना चार टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेमार्फतही कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिह्यातील या व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन काळसेकर यांनी केले आहे.