नदीकाठावर पुन्हा धास्ती : कल्लोळ-येडूर, मलिकवाड-दत्तवाड बंधारा पाण्याखाली
वार्ताहर/ एकसंबा
गेल्या चार दिवसापासून सर्वत्रच परतीच्या पावसाचा धुमाकूळ पहावयास मिळत आहे. तालुक्मयातही पावसाची संततधार सुरू असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर जाणवत आहे. तालुक्मयासह पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस बरसत असल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर दरम्यानचा बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला असून सहा फुटांनी पाणीपातळीत वाढ झाली आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्मयता आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
गतवषीप्रमाणे यंदाच्या वषीही ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा कहर सर्वत्र दिसून येत आहे. जून महिन्याच्या प्रारंभापासूनच चारही महिने पावसाने दमदार हजेरी लावली होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर पुन्हा पाऊस होईल, याची कल्पना कोणालाच नव्हती. पण ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच चार महिन्यापासून होत असलेल्या पावसाने भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या पावसाचे पाणी शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात साचत आहे. तसेच विहिरी, छोटे-मोठे नाले, ओढे भरून वाहत आहेत. चिकोडी पर्जन्यमापन केंद्रावर 86.4 मि. मी., अंकली 68.8 मि. मी., नागरमुन्नोळी 48.6 मि. मी., सदलगा 95 मि. मी. तर जोडट्टी केंद्रावर 50.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्मयात होत असलेल्या संततधार पावसामुळे सलग दुसऱया वषीही सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. पाण्यासाठी कासावीस झालेल्या दुष्काळी भागातही दमदार पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका, तलाव यांच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. दुष्काळग्रस्त समजला जाणाऱया भागातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने सदर भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळी भागात जरी समाधान होत असले तरी नदीकाठी मात्र धास्ती निर्माण झाली आहे.
मलिकवाड-दत्तवाड बंधारा पाण्याखाली
गतवषीप्रमाणे यंदाही पूरस्थिती निर्माण होणार का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर तसेच दूधगंगा नदीवरील मलिकवाड-दत्तवाड बंधाराही पाण्याखाली गेला आहे. राजापूर बंधाऱयातून 53,500 क्मयुसेक तर दूधगंगा नदीतून 12,848 क्मयुसेक असे एकूण कल्लोळ जवळ कृष्णा नदीपात्रात 66,348 क्मयुसेक पाणी येत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता नदीकाठी पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही परिणाम जाणवत आहे.
आलमट्टीतून विसर्ग वाढला
पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग पाहता कोयना 34,211 क्मयुसेक, कण्हेर 3,566 क्मयुसेक, वारणा 1,200 क्मयुसेक, राधनगरी 1,400 क्मयुसेक, काळम्मावाडी 1,200 क्मयुसेक इतका करण्यात येत आहे. तर पावसाचे प्रमाण पाहता कोयना 64 मि. मी., कण्हेर 70 मि. मी., वारणा 45 मि. मी., राधनगरी 70 मि. मी., काळम्मावाडी 36 मि. मी., महाबळेश्वर 126 मि. मी., नवजा 67 मि. मी., कोल्हापूर 130 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे आलमट्टी जलाशयात 99,760 क्मयुसेक पाण्याची आवक होत असून 1,17,000 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.