ऑनलाईन टीम / मुंबई :
घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत केमिकलची टाकी स्वच्छ करताना विषारी वायू नाकातोंडात जाऊन तीन कामगार गुदरमले. यामधील एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा आठ वाजता एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत तीन कामगार केमिकलची टाकी स्वच्छ करत होते. त्यावेळी विषारी वायू नाकातोंडात जाऊन तिन्ही कामगार गुदमरले. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यामधील रामनिगोर सरोज या कामगाराचा मृत्यू झाला. तर रुबीन डिंगकर (वय 35) आणि श्रावण सोनावणे (25) या दोघांची प्रकृती गंभीर आहे.