प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रात पंचायत मंडळाने हाती घेतलेल्या संचारबंदीला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत आहे .त्याप्रमाणे सरकारने रविवारपासून संचारबंदी लागू केल्यामुळे याचे चांगले परिणाम येणाऱया काळात आपल्याला दिसू शकतील .
आतापर्यंत नागरिकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्याबद्दल पंचायतीचे सरपंच दाऊत सय्यद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहेत .त्याचप्रमाणे येणाऱया काळात सर्वांनी अशाच प्रकारे सहकार्य देऊन भागांमध्ये वाढणारी रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचे आवाहन केलेले आहे . नागरिकांची वर्दळ जवळपास 80 टक्?क्?यांनी कमी झालेली आहे.