चक्रीवादळ मदतीसाठी 2015चे निकष,
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘निसर्ग’ने जिह्यात थैमान घातल्यानंतर जिह्यात सर्वत्र नुकसानाचे पंचनामे सुरु करण्याचे काम सुरू झाले आहे. नुकसानग्रस्तांना 13 मे 2015 रोजी जारी शासन निर्णयाप्रमाणे मदतीचे वितरण हेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानुसार कोंबडीसाठी 50 तर झोपडी वा गोठय़ाची पडझड असल्यास अनुक्रमे एकेचाळीसशे व एकविसशे रुपये एवढया भरपाईची तरतूद आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारीही सुरु केली आहे. जिल्हय़ात झालेले नुकसान पाहता 2015 च्या निकषानुसारची भरपाई अत्यंत तुटपुंजी असून त्यात वाढीची अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून दाखल होत असलेल्या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे काय घोषणा करतात याकडे नुकसानग्रस्तांचे डोळे लागून राहिले आहेत.
13 मे 2015 रोजी जारी शासन निर्णयानुसार कुकुटपालन क्षेत्रात 50 ऱू प्रति केंबडी परंतु प्रतिपुटुंब जास्तीतजास्त 5 हजार ऱू मर्यादा आह़े मत्स्यबिज शेतीसाठी 8 हजार 200 ऱू प्रतिहेक्टर, हस्तकला व हातमाग कारागिरांना यंत्रदुरूस्ती, नुतनीकरण, खराब झालेल्या कच्चा मालासाठी 4 हजार 100 रूपये एवढी रक्कम प्रति कारागीर देण्याची तरतूद आहे.
पूर्णपणे नष्ट झालेली किंवा पडझड झालेल्या घरांसाठी सखल भागात 95 हजार 100 प्रतिघर तर दुर्गम भागात 1 लाख 1 हजार 900 रूपये एवढी मदत देय आह़े अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांसाठी 5 हजार 200 तर कच्च्या घरांसाठी 3 हजार 200 रूपये प्रतिघर एवढी मदत देय आह़े पडझड किंवा नष्ट झालेल्या झोपडीसाठी 4 हजार 100 व घराला जोडून असलेल्या गोठय़ासाठी 2 हजार 100 रूपये एवढी मदत देय आह़े
मृताच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये मदत अनुज्ञेय आहे. आपत्तीमध्ये 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 59हजार 100 व 60 टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख रूपये मदत देण्यात येणार आह़े जखमी व्यक्ती एक आठवडय़ापेक्षा अधिक कालावधीसाठी रूग्णालयात असल्यास 12 हजार 700 व त्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास 4 हजार 300 रूपये भरपाई मिळणार आह़े घरे पूर्णपणे क्षतीग्रस्त झाल्यास कपडय़ांसाठी 1800 तर भांडी व अन्य वस्तुंसाठी 2 हजार रूपये भरपाई प्रतिकुटुंब देण्यात येत़े
शासन निर्णयाप्रमाणे गंभीर प्रभावित कुटुंबियांना दैनंदिन स्वरूपाची मदत देण्यात येत़े मदत छावणीमध्ये आश्रय न घेतलेल्या प्रति प्रौढ व्यक्तीला 60 रूपये, प्रतिबालकाला 45 रूपये एवढी रक्कम दरदिवशी देण्यात येत़े शेतातील गाळ,डोंगरातील जमिनीवर मातीचा ढिगारा, मत्स्य शेतीतील मातीचा थर काढण्यासाठी प्रती हेक्टर 12 हजार 200 रूपये अनुदान मिळू शकते. दरड कोसळणे आदी बाबतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱयांना 37 हजार 500 रूपये प्रति हेक्टर मदत देय आहे. शेती पिके, फळ पिके आणि वार्षिक लागवडीची पिके यासाठी कोरडवाहू क्षेत्राकरिता 6 हजार 800 रूपये प्रतिहेक्टर आणि पेरणी शेत केलेल्या शेतीच्या मर्यादेत जलसिंचित क्षेत्रासाठी 13 हजार 500 रूपये देय असून कमीत कमी अनुदान 1 हजार पेक्षा कमी नसावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बहुवार्षिक पिकांसाठी पेरणी केलेल्या क्षेत्रासाठी मर्यादित प्रतिहेक्टर 18 हजार रूपये एवढी मदत देय राहिल़ यामध्ये किमान मदत 2 हजार रूपये पेक्षा कमी नसाव़ी 2 हेक्टर पेक्षा जास्त भूधारणा असलेल्या शेतकऱयांना कोरडवाहू क्षेत्रासाठी 6 हजार 800 रूपये प्रतिहेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत तर सिंचित क्षेत्रात 13 हजार 500 रूपये निविष्ठा अनुदान देय राहणार आह़े
पशुसंवर्धनासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱयांना दुधाळ जनावरांसाठी 30 हजार रूपये, शेळी, मेंढी, डुक्कर यासाठी 3 हजार रूपये ओढकाम जनावरांसाठी 25 हजार रूपये, वासरासाठी 16 हजार रूपये एवढी मदत देण्याची या आदेशानुसार तरतूद आहे.तीन मोठे दुधाळ, किंवा तीस छोटी दुधाळ किंवा तीन मोठी ओढकाम किंवा सहा छोटी ओढकाम करणारी जनावरे या मर्यादेत अनुदान मर्यादित राहणार आह़े
रस्ते, पूल, पाणी पुरवठा योजना, सिंचन योजना , वीज पुरवठा, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायतीच्या मालकीची मालमत्ता यांचे नुकसान झाले असेल तर शासकीय दर पत्रकाप्रमाणे अनुदान देय असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मदत वाटप शासन निर्णयाप्रमाणे
चक्रीवादळाच्या संदर्भात पंचनाम्यांचे काम सुरू झाले आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी अजून काही कालावधी लागेल़ यानंतर 13 मे 2015च्या शासन निर्णयाप्रमाणे नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात येईल़
– रश्मी मटकर,
तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी