जि.प. सदस्यानी केली खांबडी,नाचणी, हरिक, तिळ पिकाची लागवड
संगमेश्वर / प्रतिनीधी
कोकणात कातळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. कातळावर शेती करीत असताना जास्त मेहनत करावी लागते . पूर्वी कोकणात खांबडी,तीळ, नाचणी , हरिक मोठ्या प्रमाणात केली जात असे, मात्र आता दुर्मिळ होणारी ही शेती नावडी जि.प .सदस्या माधवी गिते यांनी केली आहे.
जंगली जनावरांचा होणारा त्रास आणि शेतीत जास्त मेहनत कमी उत्पन्न यामुळे कातळावरील शेती कमी होत चालली आहे. त्यामुळे भात शेती कमी होत चालली आहे. त्यातच पुर्वी केली जाणारी खांबडी, तीळ, हरीक आदि पिकांची शेती करणे अनेक शेतकऱ्यांनी सोडुन दिली आहे.
माधवी गिते यांनी या शेतीचा अभ्यास करत हि शेती घेतली आहे. यासाठी त्यांना पती मनोहर गीते यांची साथ लाभली आहे. खांबडी हि शेती शक्त्तीवर्धक म्हणून पचायला खुप हलकी असते. आजारी माणसाला चांगली ब्राऊन राईस म्हणून १५० ते २०० किलो ती विकली जाते. हरीकाचा भात मधुमेहासाठी गुणकारी आहे. हरिकाची आंबोली कोकणात प्रसिध्द आहेत.