प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील मुख्य कोकण रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यांची पूर्णत दुरवस्था झाली आहे. दोन पदरी असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांत या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही.
कोकण रेल्वेचे जिल्ह्यातील मुख्य जंक्शन असलेल्या स्थानकाला मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
ठिकाठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे कोणते खड्डे चुकावाचये हा प्रश्न वाहनचालकांना सतावताना दिसून येतो. पावसात या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले दिसून येते. प्रशासनाकडून या रस्त्यांची डागडुजी कधी होणार हा प्रश्न रेल्वेस्थानकात नियमित येणाऱ्या नागरिकांना पडत आहे.