आम आदमी पक्षाचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
कोटय़वधींच्या बाता मारणाऱया सरकारचे राज्यातील खड्डेमय बनलेल्या रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. भर चतुर्थीकाळात या खड्डेमय रस्त्यातून गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि विसर्जनही याच धोकादायक रस्त्यावरून प्रवास करत करावे लागले. अशावेळी सरकारचा हा हलगर्जीपणा आणखी किती दिवस चालणार असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाने केला आहे.
पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हाबरे आणि थिवी विधानसभा प्रभारी रेशेश बोंदे यांच्या नेतृत्वाखाली थिवी येथे रस्त्यांच्या धोकादायक स्थितीविरोधात आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी म्हांबरे बोलत होते. रस्त्यांच्या या परिस्थितीस स्थानिक आमदार निळकंठ हळर्णकर यांनाच नागरिकांनी जबाबदार धरले आहे.
विकासाच्या नावाखाली काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हळर्णकर यांनी आतापर्यंत किती विकास केला हे रस्त्यांच्या स्थितीवरून स्पष्टपणे दिसत असल्याची टीका म्हांबरे यांनी केली.
कोटय़वधींचा रस्ताकर मिळत असतानाही लोकांना मूलभूत सुयोग्य रस्ते का मिळत नाहीत? असा सवाल थिवी मतदारसंघ प्रभारी रेशेश बोंदे यांनी उपस्थित केला.
आप कडून बाणावली किनाऱयावरील तारगोळे साफ
दरम्यान, ऐन चतुर्थी काळात राज्यातील अनेक समुद्रकिनाऱयांवर मोठय़ा प्रमाणात तारगोळे साचले होते. तरीही या प्रश्नी सरकारला कोणतेही गांभीर्य असल्याचे जाणवत नव्हते. त्यामुळे त्याची कोणतीही दखल घेतली जात नव्हती. हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष कॅप्टन वेन्झी व्हिएगश आणि झेडपी हॅन्झेल फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली आपचे सुमारे 50 कार्यकर्ते आणि अन्य अनेक स्थानिक नागरिकांनी बाणावली समुद्र किनाऱयावर साचलेले तारगोळे हटवून किनारा स्वच्छ केला. या सफाई दरम्यान सुमारे 36 पिशव्या भरतील एवढे तारगोळे जमा करण्यात आले.
या तारगोळ्यांचा परिणाम पर्यावरणावर होण्याबरोबरच मच्छीमारांवरही झाला आहे. तरीही सरकार गप्प होते. किनाऱयाची स्वच्छता करणे दूरच राहिले, त्यावर उपाययोजना देखील करण्यास सरकार असमर्थ ठरले आहे, त्यामुळे समुद्र किनारे प्रचंड प्रमाणात विद्रूप झाले आहेत, अशी प्रतिक्रिया कॅप्टन व्हिएगश यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आश्चर्यकारक प्रकार म्हणजे आपने किनाऱयाची स्वच्छता मोहीम हाती घेताच स्थानिक आमदार खडबडून जागे झाले आणि त्यांनीही लगेच किनारा स्वच्छता मोहिमेची घोषणा केली, अशी टीका हॅन्झेल फर्नांडिस यांनी केली.