वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या कोरोना विषाणूचा विळखा वाढताना दिसत आहे. यामुळे जगासह भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून रोख व्यवहार कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे ग्राहकांच्या डिजिटल व्यवहारात वाढ झाल्याची माहिती पेटीएमने दिली आहे. कोरोनाच्या धास्तीने जास्तीत जास्त लोक घरातून काम करत आहेत. आणि चलनाला स्पर्श करण्यात भीत असल्याचेही सांगितले जात आहे. पेटीएमच्या एका प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल व्यवहारात नेहमीपेक्षा 20 टक्क्यांनी वृद्धी झाली आहे.
पेटीएमला 1.6 कोटी सक्षम व्यापारी डिजिटल व्यवहारासोबत कार्यरत आहे. नोएडामधील मुख्यालयात डिजिटल व्यवहार संस्थाच्या मार्फत नागरिकांना जेवण आणि अन्य साहित्याच्या पुरवठय़ासाठी डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोहोत्साहीत केले आहे. यामुळे तरी चलनास स्पर्श करण्यापासून लोकांनी टाळावे यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.
डिजिटल व्यवहाराचा पर्याय
उपलब्ध माहितीनुसार इंधन स्टेशन आणि एक दुसऱयाला व्यवहार करण्यासाठीच्या व्यवहारात मोठी वधार झाली असून यामध्ये लोक रोख व्यवहारपेक्षा पेटीएमच्या आधारे व्यवहार करत आहेत. रोखीच्या व्यवहारांना फाटा देत पेटीएमला ग्राहक महत्व देत असल्याची नोंद केली आहे. करत आहेत.
प्रोत्साहन
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून बँकांना डिजिटल व्यवहाराला प्रेत्साहन देण्यासाठी सल्ला दिला होता. औद्योगिक तज्ञांच्या माहितीनुसार विविध डिजिटल व्यवहार करण्यासाठी कंपन्यांमधील व्यवहारात घसरण दिसून आली आहे. कारण मागिल एक महिन्यात पेटीएमने अधिकच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे.