कोव्हिड-19 आजारावरील औषधाचा शोध लागला नसला तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54 टक्क्यावर असल्याने कोरोना विरोधातील लढाई अर्ध्याहून अधिक प्रमाणात जिंकली आहे. मागच्याच आठवडय़ात एकाच दिवशी 8 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याचे समोर आले. कोव्हिड सतत फेज बदलत आहे. तसेच उपचारातील टप्पेही बदलत असल्याचे चित्र सरकारी रुग्णालयांमध्ये आहे. त्यामुळे कोरोना उपचारातील या बदलत्या टप्प्यांकडे लक्ष पेंद्रित केल्यास कोव्हिड सोबत जगणे सुसह्य होऊ शकते.
येत्या 9 जुलै रोजी कोरोना चार महिन्याचा होईल. 9 मार्च रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर जगाच्या अभ्यासावरून आपल्याकडेही प्रतिबंधात्मक उपचारांना सुरुवात केली गेली. मात्र मे तसेच जून महिन्याच्या मध्यापर्यंत सतत वाढती आकडेवारी डोकेदुखी ठरू लागली. तरीही साधर्म्य साधणाऱया उपचारावर भर देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. आजाराच्या अनुभवातून उपचारातील बदल होत गेल्याने बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले तर मफत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. जुलै महिनाच वाढता कोरोना संसर्ग घेऊन आला. जून महिन्यापर्यंत मुंबईतील बाधितांची संख्या दररोज हजार बाराशेमध्ये होती तर राज्यातील रोजची नोंद पाच हजाराच्या संख्येत होती. आता जुलै महिन्यात प्रवेश करताना राज्यातील रोजची नोंद 7 हजारावर गेली आहे, तर मुंबईतील रोजची नोंद बाराशेच्या उंबरठय़ावर आहे. चाचण्या वाढवल्याने रोजची नोंदही वाढत असल्याचे कारण दिले जात आहे. मात्र रोजच्या नोंदीची संख्या कमी कधी होणार यावर नेमके उत्तर कोणाकडूनही मिळत नसल्याने मुंबईकरच नव्हे तर राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. यावर लॉकडाऊनचे नियम पाळा असे सर्रास उत्तर सरकारी यंत्रणेकडून दिले जात आहे. यातही नागरिकांची अगतिकता आहे. मुंबईचे प्रातिनिधिक उदाहरण डोळय़ासमोर ठेवल्यास येथील वस्त्यांची तसेच घरांची दाटीवाटीची रचना ध्यानात घ्यावी लागेल. वस्तीत जेव्हा एखादा पॉजिटीव्ह असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते तेव्हा त्या परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. चार महिन्याच्या कालावधीनंतरही मुंबईकर कोव्हिडला मान्य करत नसल्याचे समोर येत आहे. पोलिसांचा मार खात, काही वेळा लॉकडाऊनचे नियम मोडत जे काही मुंबईकर बाहेर पडले आहेत त्याचे कारण म्हणजे गेल्या चार महिन्यात घरातील रसद आता संपत आली आहे. रिक्षामध्ये प्लास्टिकचा पडदा उभा करून रिक्षाचालक व्यवसायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हातावर पोट असणारा वर्ग हवालदिल झाला आहे. बाधितांच्या संख्येकडे पाहत असताना रोज बरे होणाऱया रुग्णांची संख्या पाहिल्यास कोरोनासोबत जगणे अधिक आशादायी होऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व पॅथी सध्या उपलब्ध औषधे आणि उपकरणासह कोरोनाच्या लढाईत उतरले आहेत. यात
ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदही मागे राहिले नाही.
रोगाच्या अनुभवानुसार उपचारातील बदल सरकारी रुग्णालयातील डॉक्टर करताना दिसून येत आहेत. मात्र त्यालाही मर्यादा दिसून येत आहेत. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना रुग्णांना हैड्रॉक्सीक्लोरोक्वीन ही मलेरियावरील गोळी दिली जाऊ लागली. ही गोळी अद्याप सुरू आहे. त्यानंतरच्या फेजमध्ये रुग्णांची आरोग्यस्थिती पाहून उपचारातील फेजदेखील बदलती ठेवली. हे सर्व उपलब्ध करून देताना शास्त्राrय बाजूने विचार करून उपचार केले जात आहेत. विषाणू प्रतिबंधात्मक, अँटीबायोटिक, स्टिरॉइड अशा औषधांचा उपचारात वापर केला जात आहे. सोबत जीवनसत्त्वांच्या औषधांचा डोसही नियमित पुरवला जात आहे. जीवनसत्त्वांच्या औषधांमध्ये सी व डी जीवनसत्त्वांच्या गोळय़ा देण्यात येत आहेत. तर अजिथ्रोमायसिन ही अँटिबायोटिक गोळी दिली जात आहे. एक विशिष्ठ गोळी तर रेमडेसवीर हे इंजेक्शन ही दोन्ही औषधे अँटीवायरल म्हणून वापरली जात आहेत तर सेप्ट्रायझोन इंजेक्शन आय व्हीमधून दिले जात आहे. त्याचवेळी पिप्टास या इंजेक्शनचा वापरदेखील केला जात आहे. या उपचारांव्यतिरिक्त प्लाझ्मा थेरपी सारखे प्रयोग पालिका रुग्णालयांमध्ये केले जात आहेत. या थेरपीने रुग्ण बरे होण्याची संख्याही लक्षणीय आहे. ही ऍलोपॅथीची औषध असून आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे उपचारही रुग्णांवर केले जात आहेत. सध्या होमिओपॅथी औषधांचीही बरीच मदत होताना दिसून येत आहे. सुरुवातीला अर्सेनिक ऍल्बम 30 या गोळय़ा देताना त्याचा सकारात्मक परिणाम पाहून नगरसेवकांकडून सर्व स्थानिक वस्त्यांमध्ये त्याचे मोफत वाटप करण्यात आले. मात्र बदलणारा कोव्हिड पाहून अर्सेनिक
ऍल्बम 30 गोळय़ांमध्ये बदल करून आता अर्सेनिक ऍल्बम 200 देण्याचा निर्णय आयुष्य टास्क फोर्स प्रमुखांकडून घेण्यात आला. या औषधाचा डोसही सध्या सुरू आहे तर आयुर्वेद शास्त्रातून रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे काढे सुचवण्यात आले. सुरुवातीला सुंठ, मिरी, लवंग, दालचिनी, तुळस याचा गूळ टाकून काढा सुचविण्यात आला. हे सुरू असताना दुसऱया टप्प्यात लगेचच अश्वगंधा धनावटी, आणि गिलोय अशा दोन गोळय़ा सुचवण्यात आल्या, तर तुळशी ड्रॉप सकाळी पाण्यात टाकून घेण्यास सुचवले.
मुंबईतील कोव्हिड आजाराचा अभ्यास संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरावा असा आहे. ही साथ एवढय़ात जाणारी नाही याची समज आता येऊ लागली असली तरी सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळून गंभीर उपचारातील स्थिती येण्याची टाळावी. मास्क, सोशल डिस्टंसिंग हे कोरोनावरील ठोस उपाय नाहीत. मात्र संसर्गाचा फैलाव पाहता डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क लावणे आवश्यक आहे. कोव्हिड-19 आजारावरील औषधाचा शोध लागला नसला तरीही राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54 टक्क्यावर आहे. रविवारपर्यंत 1,11,740 रुग्ण बरे होऊन घरी परतले. ही बाब कोव्हिडच्या उपचारातील टप्प्यातील सकारात्मक बाजू आहे. उपचारातील या बदलत्या टप्प्यांकडे लक्ष पेंद्रित केल्यास कोव्हिडसोबत जगणे सुसह्य होऊ शकते.
राम खांदारे