जुलैमध्ये 50 लाख नोकऱया गमावल्या : सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीच्या अहवालात माहिती
नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून कोरोना आणि लॉकडाऊनचा प्रभाव असल्यामुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. यामध्ये जुलै महिन्यामध्ये जवळपास 50 लाख नोकऱया गमावल्या आहेत. तसेच आतापर्यंत महामारीच्या कारणामुळे 1.89 कोटी जणांना आपला रोजगार गमावावा लागला आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयइ) यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
जूनमध्ये केंद्राने अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्याने काही प्रमाणात नोकऱया पुन्हा उपलब्ध होत होत्या. परंतु स्थानिकपातळीवर काही प्रमाणात परिस्थितीनुसार लॉकडाऊनमुळे जुलैमध्ये नोकऱयांमध्ये पुन्हा घसरण होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे.
एप्रिलमध्ये जवळपास 1.77 कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. तर मे महिन्यात 1 लाख नोकऱया गेल्या आहेत. त्याच्यानंतर जूनमध्ये जवळपास 39 लाख लोकांना पुन्हा नोकऱया प्राप्त झाल्या असल्याची माहिती सीएमआइने दिली आहे.
लॉकडाऊनचा प्रारंभ झाल्यापासून नोकरीपेशा कर्मचाऱयांची स्थिती अतिशय खराब होत आली आहे. आतापर्यंत 1.89 कोटी लोकांनी नोकऱया गमावलेल्या आहेत. देशात जवळपास 21 टक्के लोक नोकरपेशा असून यातील अनेकजण कोरोनाच्या प्रभावाने अडचणीत राहिल्याचे सीएमआयइने सांगितले आहे.