जिल्हाधिकाऱयांच्या आदेशामुळे यंदाही पर्यटकांचा हिरमोड : मात्र कोरोनासाठी दक्षता घेणे गरजेचेच
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीने सारेजण होरपळत आहेत. उद्योग व्यवसायासह सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. पर्यटन स्थळांवरही निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे याचा फटका मॅक्सिकॅबसह इतर वाहतूक करणाऱयांना बसला आहे. याचबरोबर पर्यटनस्थळाजवळील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झाला असून अनेकजण त्यामुळे बेरोजगार झाले आहेत. नुकताच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
बेळगावचे हवामान आणि येथील बदलत राहणारे वातावरण साऱयांनाच हवेहवेसे वाटते. दुसरे महाबळेश्वर म्हणून बेळगावची अख्यायिका आहे. यामुळेच तर येथे पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्राबरोबरच गोव्यातील नागरिकही येतात. महत्त्वाचे म्हणजे बेळगावपासून अवघ्या काही अंतरावर विविध पर्यटनस्थळांनी भुरळच घातली आहे. त्यामुळे मान्सून सुरू झाला की त्याकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला असतो. कोरोना कमी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटकांनी विविध ठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पुन्हा धोका वाढणार, असे लक्षात येताच तातडीने त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोरोनामुळे आनंदावर विरजन
बेळगावातील निसर्गाने ओढलेला हिरवा शालू याचा मनसोक्त आनंद घेताना काही तरुण-तरुणींसह इतर नागरिकही भारावून जातात. मान्सून सुरू झाला की बेळगाव परिसरातील प्रेक्षणीय स्थळे फुलू लागतात. यामुळे हिरव्यागार वनराई पर्यटकांना भुरळ पाडण्यास कोणतीच कसर सोडत नाही. यामुळे पर्यटक आपोआपच खेचला जातो. बेळगाव परिसरात 70 ते 80 कि. मी. अंतरावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे पावसाळय़ात आवर्जुन त्याठिकाणी मित्रमंडळी तसेच कुटुंबांसह सहल काढली जातेच. पावसात मनसोक्त भिजत त्याचा आनंद घेतला जातो. मात्र कोरोनाने या आनंदावर विरजन घातले आहे.
बेळगावबरोबरच लागूनच असलेल्या महाराष्ट्रातील अशा पर्यटनस्थळांना पर्यटक जात असतात. महाराष्ट्रातील आंबोली, तिलारी, महिपाळगड तसेच हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान व कर्नाटकातील गोडचिनमल्ली, स्वप्निल पॉईंट, दूधसागर आदी पर्यटनस्थळे आहेत. मान्सूनमध्ये दररोज अनेक पर्यटक येथे ये-जा करतात. घाटमाथ्यावरून कोसळणाऱया झऱयामुळे मनसोक्त आनंद घेताना येथील पर्यटक दिसून येतात. या आनंदाचा उलगडा होणे कठीणच आहे. अशा पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेकजण उल्हसित असतात. मात्र आता या आदेशामुळे कोणालाच त्याचा आनंद घेता येणार नाही.
तरुणाईचा ओढा अधिक
निसर्गाने नटलेल्या हिरव्यागार वनराईत मनमोकळेपणे राहण्यासाठी विशेष करून तरुणाईचा ओढा अधिक दिसून येतो. आपल्या मित्र, मैत्रिणींसमवेत पर्यटनस्थळी जाण्यास दरवषी प्लॅन केले जातात. घाटमाथ्यावरून पडणाऱया हिरव्यागार डोंगरातून जणू दूधच फेसाळत असते. निसर्गरम्य वातावरणात अशी पर्यटनस्थळे सर्वांनाच भुरळ घालतात. यामुळे जो तो या निसर्गाच्या देखाव्यांकडे आपोआप खेचला जातो. मात्र यावषीही पर्यटकांना अशा निसर्गरम्य ठिकाणी जाणे अशक्मय आहे.